Homeटॉप स्टोरीआम्ही आईपुढेही माथा...

आम्ही आईपुढेही माथा झुकवत नाही!

आमचा धर्म आम्हाला कोणासमोरही झुकण्यास मान्यता देत नाही. आम्ही आमच्या आईपुढेदेखील माथा झुकवत नाही. त्यामुळे आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही, अशी ठाम भूमिका समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांनी आज विधानसभेत मांडल्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेवर अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. आफताब पूनावला याने एक मोठे कांड केले. एका मुलीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. यातून संपूर्ण देशात मुसलमान विरोधात वातावरण पेटले. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांत सकल हिंदू आक्रोश रॅली काढण्यात आल्या. याद्वारे मुस्लिमांना इतके अपमानित केले गेले की जसे काही या देशात मुसलमान सगळ्यात मोठे देशद्रोही आहेत. जेव्हाजेव्हा देशात रक्ताची गरज भासली, तेव्हातेव्हा मुसलमान सगळ्यात आधी पुढे आला आहे. आता आम्हाला सांगितले जाते की हा देश तुमचा नाही, असे आझमी म्हणाले.

औरंगाबाद येथील २९ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता राम मंदिराजवळ तीन युवक मोटारसायकलवर आले. त्यांनी तिथे घोषणा दिल्या. त्या युवकांनी घोषणा दिल्या की तुम्हाला वंदे मातरम् म्हणावे लागेल. मी वंदे मातरम् म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो. आझमी यांच्या या वक्तव्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदस्य ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

अध्यक्षांनी अबू आझमी यांना लक्षवेधी सूचनेतील मुद्द्याच्या पलीकडे न बोलण्याचे निर्देश दिले. तरी आझमी बोलतच होते- त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी दोन्ही समूहातील युवकांना पांगवले. मात्र, संध्याकाळी पुन्हा सुमारे वीस युवक आले आणि पुन्हा घोषणा दिल्या की या देशात राहायचे असेल तर तुम्हाला वंदे मातरम् म्हणावे लागेल. आझमी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण सभागृहात गदारोळ सुरू राहिल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content