Homeन्यूज अँड व्ह्यूजआम्हालाही राजकारणात तिरक्या...

आम्हालाही राजकारणात तिरक्या चालीच्या उंटांशी सामना करावा लागतो..

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद याने एकाच वेळी २२ खेळाडूंसोबत मुकाबला केला. खरे तर त्याने राजकारणात यायला हवे. राजकारणात आम्हालाही एकाच वेळी अनेक विरोधकांशी मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरख्या चालीचे उंट असतात. काही अडीच घर चालणारे घोडे असतात. काही हत्ती असतात. सर्वांशी मुकाबला करावा लागतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये रोटरी क्लब, ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप एकेडमी यांच्या वतीने बुद्धिबळाचे प्रदर्शनीय सामने भरविण्यात आले होते. त्यात पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद एकाच वेळी २२ प्रतिस्पर्धी मुलांशी खेळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार होते. परंतु कार्यबाहुल्यामुळे ते प्रत्यक्ष पोहोचू शकले नाहीत आणि त्यांनी आपला व्हिडिओ संदेश कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठवला. त्यात त्यांनी ही माहिती दिली.

गेल्या वर्षभरापासून मला चेकमेट करण्यासाठी अनेकजण सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे स्वप्न साकार होत नाही. त्यांनी आपली कितीही शक्ती पणाला लावली तरी जनतेचा विश्वास आणि पाठिंबा आमच्याबरोबर असल्यामुळे त्यांना यश येणार नाही असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

२००५ साली बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्याचे काम अपस्टेप एकेडमी करत आहे. आतापर्यंत या संस्थेने २१ हजार २५२ मुलांना बुद्धिबळ खेळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या उपक्रमात २६ शाळा त्यांच्यासोबत सहकार्य करत आहेत. ४३ केंद्रांतून ही संस्था प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे तर २१६ स्पर्धांचे आयोजनही या संस्थेने केले आहे.

(सर्व छायाचित्रेः गौरव कागडा)

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content