Homeन्यूज अँड व्ह्यूजआम्हालाही राजकारणात तिरक्या...

आम्हालाही राजकारणात तिरक्या चालीच्या उंटांशी सामना करावा लागतो..

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद याने एकाच वेळी २२ खेळाडूंसोबत मुकाबला केला. खरे तर त्याने राजकारणात यायला हवे. राजकारणात आम्हालाही एकाच वेळी अनेक विरोधकांशी मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरख्या चालीचे उंट असतात. काही अडीच घर चालणारे घोडे असतात. काही हत्ती असतात. सर्वांशी मुकाबला करावा लागतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये रोटरी क्लब, ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप एकेडमी यांच्या वतीने बुद्धिबळाचे प्रदर्शनीय सामने भरविण्यात आले होते. त्यात पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद एकाच वेळी २२ प्रतिस्पर्धी मुलांशी खेळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार होते. परंतु कार्यबाहुल्यामुळे ते प्रत्यक्ष पोहोचू शकले नाहीत आणि त्यांनी आपला व्हिडिओ संदेश कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठवला. त्यात त्यांनी ही माहिती दिली.

गेल्या वर्षभरापासून मला चेकमेट करण्यासाठी अनेकजण सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे स्वप्न साकार होत नाही. त्यांनी आपली कितीही शक्ती पणाला लावली तरी जनतेचा विश्वास आणि पाठिंबा आमच्याबरोबर असल्यामुळे त्यांना यश येणार नाही असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

२००५ साली बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्याचे काम अपस्टेप एकेडमी करत आहे. आतापर्यंत या संस्थेने २१ हजार २५२ मुलांना बुद्धिबळ खेळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या उपक्रमात २६ शाळा त्यांच्यासोबत सहकार्य करत आहेत. ४३ केंद्रांतून ही संस्था प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे तर २१६ स्पर्धांचे आयोजनही या संस्थेने केले आहे.

(सर्व छायाचित्रेः गौरव कागडा)

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content