Homeमुंबई स्पेशलफिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी...

फिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी मिळते ८० रूपये बादली!

मुंबईतील गोरेगाव नजीकच्या आरे कॉलनीच्या फिल्टरपाड्यातून एक नाला वाहतो. तो पवईकडे जातो. हा नाला वाहत असताना आपल्याबरोबर गाळ आणि घाण नेत असतो. पण या नाल्याच्या एका टोकाला एका महिला नाला अडवून त्यातील पाणी अर्थात घाणीसह एका खड्ड्यात जमा करून ठेवते, अशी माहिती हाती आली आहे. अर्थात खड्ड्यात जमवलेले पाणी काही काळ स्थिर झाल्याने अगदी थोड्या वेळातच ते स्वच्छ दिसू (पाण्याचा तो गुणधर्मच असतो) लागते. येथे दुसरा अंक सुरु होतो. हे जमा झालेले नाल्याचे पाणी एका बादलीस (मध्यम आकाराची) रुपये ८० फक्त, या दाराने ही महिला दिवसभर विकत असते.

फिल्टर पाडा किंवा कुठल्याही झोपडपट्टीत पाणीटंचाई ही नेहमीचीच असते. हे पाणी पवईजवळील एल अँड टी चौक परिसरात असलेल्या खाऊ गल्लीतील टपऱ्या विकत घेऊन खाद्यपदार्थ बनवून विकत असतात. संतापजनक बाब म्हणजे या फिल्टर पाड्यानजीकच पवईकडे जाताना मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाचे प्रमुख कार्यालय आहे. या व्हिडीओत उभी असलेली बाईक दिसत असून त्याच्यापासून पाऊलभर अंतरावरच हा पाणी साठवण्याचा खड्डा आहे. वनराई पोलीसठाणे, पवई पोलीसठाणे आणि महापालिका प्रशासन याविरुद्ध काही कारवाई करेल या आशेने नागरिक दिवस काढत आहेत. विशेष माहिती हाती आली की, फिल्टरपाड्यात काहीही घडले की कारवाई होवो. किंवा न होवो वनराई व पवई पोलीसठाणे हद्दीचा वाद जरूर निर्माण करतात व या वादानेच समाजकंटकांचे फावते असे आरे कॉलनीतील अनेक. नागरिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Continue reading

आव्हान भाजप-शिवसेनेपुढचे!

राज्यातील महापालिका निवडणुका अटीतटीच्या झाल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बाजी मारल्याबद्दल त्या दोघांचे मनापासून अभिनंदन! विशेषतः मुंबई महापालिकाही त्यांनी पहिल्याच फटक्यात ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. राज्यातील अन्य महापालिका जिंकणे आणि मुंबई...

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज...
Skip to content