Homeमुंबई स्पेशलफिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी...

फिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी मिळते ८० रूपये बादली!

मुंबईतील गोरेगाव नजीकच्या आरे कॉलनीच्या फिल्टरपाड्यातून एक नाला वाहतो. तो पवईकडे जातो. हा नाला वाहत असताना आपल्याबरोबर गाळ आणि घाण नेत असतो. पण या नाल्याच्या एका टोकाला एका महिला नाला अडवून त्यातील पाणी अर्थात घाणीसह एका खड्ड्यात जमा करून ठेवते, अशी माहिती हाती आली आहे. अर्थात खड्ड्यात जमवलेले पाणी काही काळ स्थिर झाल्याने अगदी थोड्या वेळातच ते स्वच्छ दिसू (पाण्याचा तो गुणधर्मच असतो) लागते. येथे दुसरा अंक सुरु होतो. हे जमा झालेले नाल्याचे पाणी एका बादलीस (मध्यम आकाराची) रुपये ८० फक्त, या दाराने ही महिला दिवसभर विकत असते.

फिल्टर पाडा किंवा कुठल्याही झोपडपट्टीत पाणीटंचाई ही नेहमीचीच असते. हे पाणी पवईजवळील एल अँड टी चौक परिसरात असलेल्या खाऊ गल्लीतील टपऱ्या विकत घेऊन खाद्यपदार्थ बनवून विकत असतात. संतापजनक बाब म्हणजे या फिल्टर पाड्यानजीकच पवईकडे जाताना मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाचे प्रमुख कार्यालय आहे. या व्हिडीओत उभी असलेली बाईक दिसत असून त्याच्यापासून पाऊलभर अंतरावरच हा पाणी साठवण्याचा खड्डा आहे. वनराई पोलीसठाणे, पवई पोलीसठाणे आणि महापालिका प्रशासन याविरुद्ध काही कारवाई करेल या आशेने नागरिक दिवस काढत आहेत. विशेष माहिती हाती आली की, फिल्टरपाड्यात काहीही घडले की कारवाई होवो. किंवा न होवो वनराई व पवई पोलीसठाणे हद्दीचा वाद जरूर निर्माण करतात व या वादानेच समाजकंटकांचे फावते असे आरे कॉलनीतील अनेक. नागरिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Continue reading

.. म्हणून तर उत्तर प्रदेशातल्या झुंडी धावतात इतर राज्यांमध्ये!

"निचली जात है ससूरे.. तुम्हारी हिमंत कैसे हुई, बारात निकालनेकी.. ** मस्ती आवे क्या? चलो सथी, ये बारातीयोंकी जमके मारो.." हा डायलॉग काही कुठल्या वेबसिरीजमधला नाही. परंतु असं घडलंय मात्र नक्की!! तेही उत्तर प्रदेशमधील मथुरा (तेच ते अब मथुरा...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या 'आनंदाश्रम' परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता...

खरंतर हिंदीभाषिकांनी इतर राज्यांच्या भाषा शिकाव्यात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील नवे सरकार राज्यात आल्यापासून हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय सुरु झाला आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषा इंग्रजी व हिंदीचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. काही प्रमाणात ते ठीकही आहे. परंतु हिंदी...
Skip to content