Homeकल्चर +वॉर 2मध्ये दिसणार...

वॉर 2मध्ये दिसणार हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातली टक्कर

यशराज फिल्म्सचा वॉर 2, अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 2025मधील सर्वात जास्त उत्सुकता असलेला चित्रपट आहे. आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केलेला हा भव्य पॅन-इंडिया अ‍ॅक्शन स्पेक्टॅकल, यशराज फिल्म्सच्या फेमस वायआरएफ स्पाई यूनिवर्समधील सहावा भाग आहे, ज्यात आतापर्यंत फक्त ब्लॉकबस्टर चित्रपटच आले आहेत. अयानने उघड केलं की, त्यांनी पूर्ण लक्ष वॉर 2च्या कथानक तयार करण्यावरच केंद्रित केलं, कारण त्यांना हृतिक रोशन आणि एनटीआर या दोन दिग्गजांना भिडवण्यासाठी तितकाच मोठा संघर्ष हवा होता.

अयान म्हणाला की, वॉर 2सारख्या एका अतिशय लोकप्रिय फ्रँचायझीला पुढे नेणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यावर स्वतःची छाप सोडणंही. वॉर 2चे दिग्दर्शन करणं ही माझ्यासाठी एक सुंदर संधी होती, जिथे मी पहिल्या चित्रपटाला सलाम करू शकलो. जर असं नसतं, तर अशा ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये काम करण्याचा काही उपयोग नाही. दिग्दर्शक म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतो की, मी स्वतःला पूर्णपणे यात बुडवून टाकलं आहे, कारण प्रेक्षकांना एक नवीन मार्ग देणं गरजेचं आहे जे त्यांना हवंहवंसं वाटेल. वॉर 2मधील प्रत्येक गोष्ट खूप नियोजनपूर्वक तयार करण्यात आली आहे, जेणेकरून प्रेक्षकांचा थिएटरमधील अनुभव अधिक भव्य आणि थरारक होईल. सर्वाधिक वेळ आम्ही अ‍ॅक्शन सीन्स आणि कथानक, विशेषतः संघर्ष तयार करण्यात घालवला, जो हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातील आमनेसामनेच्या भिडंतीस योग्य न्याय देईल.

अयान मानतो की, वॉर 2, हा एक चित्रपट नसून भारतीय सिनेमाची ताकद साजरा करणारा एक महोत्सव आहे. तो हृतिक आणि एनटीआर यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांना एकत्र आणतो आणि एक असा थरारक अनुभव देतो, जो प्रेक्षकांचा श्वास रोखून धरतो. हे खरंतर भारतीय सिनेमाचं एकत्र येणं आहे, जिथे हे दोन दिग्गज कलाकार एकत्र येत आहेत. आम्हाला माहीत होतं की या जोडीविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड अपेक्षा असतील आणि आम्ही प्रत्येक सेकंद याच विचारात घालवला की, प्रेक्षक जेव्हा थिएटरमध्ये बसतील, तेव्हा त्यांना आयुष्यातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव कसा देता येईल.

वॉर 2 हा चित्रपट येत्या 14 ऑगस्टला जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content