Homeकल्चर +हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून ते रोमच्या ऐतिहासिक आणि मोहक रस्त्यांपर्यंतच्या लोकेशन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

कियारा अडवाणी म्हणाली की, “इथे अगदी योग्य प्रमाणात ऊन आणि सुखद गारवा होता. मला इथेच थांबावं, आराम करावा आणि या थर्मल पूलमध्ये पोहत राहवं असं सतत वाटत होतं. हे एकदम स्वप्नवत आणि मनमोहक आहे.”

कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस म्हणाला की, “टस्कनीने आम्हाला कमालीचं सौंदर्य दिले आहे. इथलं रंगसंगतीचं दृश्य अचूक आहे. ही लोकेशन गाण्याला एक वेगळी उंची देते.”

दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाले की, “या प्रेमगीतासाठी अशी पार्श्वभूमी हवी होती जी प्रेम, प्रवास आणि नात्यांची ऊर्जा दाखवू शकेल. दोन व्यक्ती प्रेमात आहेत आणि एकत्र जग पाहत आहेत, अशी भावना निर्माण करणारी लोकेशन म्हणून इटली निवडल्यावर मी खूप आनंदी होतो. रोममध्ये गेल्यावर मला वाटलं की, कोलोसियम, स्पॅनिश स्टेप्स आणि ट्रेवी फाउंटन या आयकॉनिक जागांवर चित्रिकरण करणं आवश्यक आहे. याठिकाणी शूटिंगसाठी परवानगी मिळवणं खूपच कठीण होतं, पण सुदैवाने सर्व काही जमून आलं आणि आम्ही त्या सर्व ठिकाणी शूट करू शकलो. हे गाणं तयार करताना संपूर्ण टीममध्ये एक सकारात्मक ऊर्जा होती. हे एक ‘फील गुड’ गाणं आहे. आम्हाला हे बनवताना खूप आनंद मिळाला आणि आम्ही प्रेक्षकांनाही तोच आनंद मिळेल अशी आशा करतो.”

‘वॉर 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे आणि तो आदित्य चोप्रा यांनी निर्मित केलेला आहे. हा चित्रपट येत्या 14 ऑगस्टला हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content