‘वन नेशन, वन इलेक्शन’ला मोदी कॅबिनेटची मान्यता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत (कॅबिनेट) ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिल्यामुळे संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात संबंधित विधेयक मांडण्यात येईल आणि शक्य झाले तर ते संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूरही करून घेतले जाईल. मात्र, निवडणुकीची ही पद्धत नेमकी कधीपासून अंमलात येईल, हे संसदेतच स्पष्ट होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

संपूर्ण देशात एकाचवेळी लोकसभा तसेच विधानसभा आणि शक्य झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची संकल्पना म्हणजे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ होय. याची शक्याशक्यता पडताळण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने केंद्रीय निवडणूक आयोग, सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष तसेच इतर संबंधित शासकीय यंत्रणांशी चर्चा करून यावर आपला अहवाल तयार केला. या अहवालात ‘वन नेशन वन इलेक्शन’ देशात शक्य असल्याचे मत नोंदविले गेले असल्याचे कळते. या अहवालाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारले आणि त्यानुसार संबंधित मसुद्याला मान्यता दिली, असे सूत्रांनी सांगितले.

या धोरणानुसार कधीपासून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी केली जाईल, त्याचे निकष, त्यातील कायदेशीर, घटनात्मक तरतुदी आदी सारा तपशील निश्चित केला जाईल. हे सारे निश्चित होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीला कदाचित २०३४ सालच्या निवडणुका उजाडतील, असेही जाणकारांना वाटते. आज देशात कुठे ना कुठे निवडणुका चालू असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च होचो आणि आचारसंहितेमुळे विकासकामांना बाधा निर्माण होते. या अडचणी दूर करण्याकरीता ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पना पुढे आली.

Continue reading

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात...

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...
Skip to content