‘वन नेशन, वन इलेक्शन’ला मोदी कॅबिनेटची मान्यता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत (कॅबिनेट) ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिल्यामुळे संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात संबंधित विधेयक मांडण्यात येईल आणि शक्य झाले तर ते संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूरही करून घेतले जाईल. मात्र, निवडणुकीची ही पद्धत नेमकी कधीपासून अंमलात येईल, हे संसदेतच स्पष्ट होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

संपूर्ण देशात एकाचवेळी लोकसभा तसेच विधानसभा आणि शक्य झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची संकल्पना म्हणजे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ होय. याची शक्याशक्यता पडताळण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने केंद्रीय निवडणूक आयोग, सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष तसेच इतर संबंधित शासकीय यंत्रणांशी चर्चा करून यावर आपला अहवाल तयार केला. या अहवालात ‘वन नेशन वन इलेक्शन’ देशात शक्य असल्याचे मत नोंदविले गेले असल्याचे कळते. या अहवालाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारले आणि त्यानुसार संबंधित मसुद्याला मान्यता दिली, असे सूत्रांनी सांगितले.

या धोरणानुसार कधीपासून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी केली जाईल, त्याचे निकष, त्यातील कायदेशीर, घटनात्मक तरतुदी आदी सारा तपशील निश्चित केला जाईल. हे सारे निश्चित होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीला कदाचित २०३४ सालच्या निवडणुका उजाडतील, असेही जाणकारांना वाटते. आज देशात कुठे ना कुठे निवडणुका चालू असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च होचो आणि आचारसंहितेमुळे विकासकामांना बाधा निर्माण होते. या अडचणी दूर करण्याकरीता ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पना पुढे आली.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content