Homeटॉप स्टोरीउद्धवजी, स्वा. सावरकरांचे...

उद्धवजी, स्वा. सावरकरांचे नाव पुसू पाहणाऱ्यांना देणार समर्थन?

उद्धवजी, ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात ते जर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव पुसायला निघाले आहेत. धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत… यावर आता तुमचे नेमके मत काय आहे, हेदेखील तुम्ही सांगितले पाहिजे. की सत्तेकरीता तुम्ही हाही समझोता केला का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

कर्नाटक सरकराने पाठ्यपुस्तकातून स्वा. सावरकरांवरील तसेच डॉ. हेडगेवार यांच्यावरील धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, एखादा धडा तुम्ही वगळू शकता. पण लोकांच्या मनातून तुम्ही वीर सावरकर काढू शकत नाही, तुम्ही हेडगेवार काढू शकत नाही. तुम्ही एकही स्वातंत्र्यसंग्राम सेनानीना लोकांच्या मनातून काढू शकत नाही. 

काँग्रेसचे सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळे काहीच अपेक्षित नाहीत. केवळ अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याकरीता, ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटक सरकार घेत आहे, माझा महाविकास आघाडीला सवाल आहे. तुम्ही जे सांगता की, महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का?, असा सवालही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content