Homeटॉप स्टोरीअसे असतात संवेदनशील...

असे असतात संवेदनशील मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्याकडे जात असताना चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर एक एम्ब्युलन्स बंद पडलेली त्यांच्या निदर्शनास आली. हे पाहताच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबून त्या संबंधित एम्ब्युलंसची चौकशी केली व त्यातील पेशंटला तत्काळ मदत करण्यासाठी ताफ्यामधली एम्ब्युलंस ठाणे शासकीय रुग्णालय येथे त्वरित पाठवून दिली. त्यानंतर त्यांनी संबंधित डॉक्टरांशी फोनवर चर्चा करून रूग्णाला तत्काळ सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले.

कालही जन्मतः दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले होते. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणारा गणेश माळी, वय अवघं ९ वर्षं असलेला गणेश इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. जन्मापासूनच दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या कोवळ्या वयातही त्याचं शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचे अपंगत्व थांबवू शकले नाही. हात नसल्यामुळे त्याने मुख्यमंत्र्यांना पायाने त्यांचे संपूर्ण नाव लिहून दाखवले.

काही दिवसांपूर्वी गणेशला अपंगत्व आहे, त्याला मदत करा असे आर्जव करत त्याचे वडील त्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे घेऊन आले होते. परंतु हा आजार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसत नसल्याने चिवटे यांनी त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून दिली. त्यांनी लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेतली. पहिल्या टप्प्यामध्ये ५ लक्ष रूपयाचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच लवकरच त्याला कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गणेशला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मोठं होऊन काय बनायचं आहे?” असा प्रश्न विचारला असता गणेशने “मला मोठं झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे आणि दुश्मनांना गोळ्या घालायच्या आहेत” असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशचं आर्मीमध्ये भरती होण्याच स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content