Homeटॉप स्टोरीअसे असतात संवेदनशील...

असे असतात संवेदनशील मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्याकडे जात असताना चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर एक एम्ब्युलन्स बंद पडलेली त्यांच्या निदर्शनास आली. हे पाहताच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबून त्या संबंधित एम्ब्युलंसची चौकशी केली व त्यातील पेशंटला तत्काळ मदत करण्यासाठी ताफ्यामधली एम्ब्युलंस ठाणे शासकीय रुग्णालय येथे त्वरित पाठवून दिली. त्यानंतर त्यांनी संबंधित डॉक्टरांशी फोनवर चर्चा करून रूग्णाला तत्काळ सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले.

कालही जन्मतः दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले होते. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणारा गणेश माळी, वय अवघं ९ वर्षं असलेला गणेश इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. जन्मापासूनच दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या कोवळ्या वयातही त्याचं शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचे अपंगत्व थांबवू शकले नाही. हात नसल्यामुळे त्याने मुख्यमंत्र्यांना पायाने त्यांचे संपूर्ण नाव लिहून दाखवले.

काही दिवसांपूर्वी गणेशला अपंगत्व आहे, त्याला मदत करा असे आर्जव करत त्याचे वडील त्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे घेऊन आले होते. परंतु हा आजार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसत नसल्याने चिवटे यांनी त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून दिली. त्यांनी लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेतली. पहिल्या टप्प्यामध्ये ५ लक्ष रूपयाचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच लवकरच त्याला कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गणेशला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मोठं होऊन काय बनायचं आहे?” असा प्रश्न विचारला असता गणेशने “मला मोठं झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे आणि दुश्मनांना गोळ्या घालायच्या आहेत” असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशचं आर्मीमध्ये भरती होण्याच स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content