Homeटॉप स्टोरीअसे असतात संवेदनशील...

असे असतात संवेदनशील मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्याकडे जात असताना चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर एक एम्ब्युलन्स बंद पडलेली त्यांच्या निदर्शनास आली. हे पाहताच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबून त्या संबंधित एम्ब्युलंसची चौकशी केली व त्यातील पेशंटला तत्काळ मदत करण्यासाठी ताफ्यामधली एम्ब्युलंस ठाणे शासकीय रुग्णालय येथे त्वरित पाठवून दिली. त्यानंतर त्यांनी संबंधित डॉक्टरांशी फोनवर चर्चा करून रूग्णाला तत्काळ सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले.

कालही जन्मतः दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले होते. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणारा गणेश माळी, वय अवघं ९ वर्षं असलेला गणेश इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. जन्मापासूनच दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या कोवळ्या वयातही त्याचं शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचे अपंगत्व थांबवू शकले नाही. हात नसल्यामुळे त्याने मुख्यमंत्र्यांना पायाने त्यांचे संपूर्ण नाव लिहून दाखवले.

काही दिवसांपूर्वी गणेशला अपंगत्व आहे, त्याला मदत करा असे आर्जव करत त्याचे वडील त्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे घेऊन आले होते. परंतु हा आजार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसत नसल्याने चिवटे यांनी त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून दिली. त्यांनी लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेतली. पहिल्या टप्प्यामध्ये ५ लक्ष रूपयाचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच लवकरच त्याला कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गणेशला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मोठं होऊन काय बनायचं आहे?” असा प्रश्न विचारला असता गणेशने “मला मोठं झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे आणि दुश्मनांना गोळ्या घालायच्या आहेत” असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशचं आर्मीमध्ये भरती होण्याच स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content