Homeएनसर्कलनिवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्राची देशभरात...

निवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्राची देशभरात विशेष मोहीम सुरू!

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने विभागात तसेच केंद्र सरकारी निवृत्तीधारकांच्या संस्थांमार्फत देशभरात 3.0 ही विशेष मोहीम सुरू केली आहे. 15 सप्टेंबर 2023पासून मोहिमेचा प्राथमिक टप्पा सुरू झाला. मोहिमेदरम्यान साध्य करण्यासाठी लक्ष्य ठरवण्यासाठीचा हा टप्पा होता. मुख्य मोहीम दोन ऑक्टोबर 2023पासून सुरू झाली आणि ती 31 ऑक्टोबर 2023पर्यंत चालेल.

यामध्ये प्रलंबित गोष्टींचा निपटारा, स्वच्छतेची सवय बाणवणे, अंतर्गत व्यवस्थापन पद्धती बळकट करणे, नोंदी व्यवस्थापनात सुधारणा यावर भर राहील.

या विशेष मोहिमेच्या तयारीच्या टप्प्यात विभागाने आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीधारक संघटनेने देशभरात 50 स्वच्छतास्थळे ठरवली.

आतापर्यंत लक्ष्य निर्धाराच्या बाबतीत उत्तम यश मिळालेले आहे. यावर्षी पाच हजार सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि 600 सार्वजनिक तक्रार अपीलांचे निवारण करण्याचे लक्ष्य विभागाने निश्चित केले आहे. 1358 फाईल्स या मोहिमेदरम्यान पुनर्आढाव्यासाठी निश्चित करण्यात आल्या आणि 883 इलेक्ट्रॉनिक फाईल बंद करण्यासाठी निश्चित केल्या गेल्या. या मोहिमेबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकृत समाज माध्यम हँडलवर आधी व्ट्विटर आणि आता एक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाज माध्यमांवर पन्नासहून अधिक संदेश दिले गेले. ठराविक काळासाठी विभागाने निश्चित केलेले लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने ही मोहीम पूर्ण वेगाने सुरू आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content