Homeपब्लिक फिगरपिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची...

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची जबाबदारी सध्या विलास लांडेंकडेच

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे शहराध्यक्ष यांनी काल आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे विशाळगडाकडे रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज थेट पिंपरी-चिंचवडचे सर्किट हाऊस गाठले. तेथे त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली आणि पिपरी चिंचवडमध्ये पक्षांतर्गत सुरू झालेली पडझड थोपवण्याची जबाबदारी सध्यातरी माजी आमदार विलास लांडे यांच्यावर सोपवली असल्याचे कळते.

काल शरद पवार यांच्या उपस्थितीत अजय गव्हाणे यांच्याबरोबर पिंपरी परिसरातले जवळजवळ २० माजी नगरसेवकही त्यांच्या पक्षात दाखल झाले. त्यामुळे विधानसभेची ही जागा आता गव्हाणे लढवणार असल्याची चिन्हे दिसू लागली. पर्यायाने येथून इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. विधानसभेत पवार गटाला मतदान करायचे की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी हे कार्यकर्ते आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळेच काल खासदार अमोल कोल्हे यांनी आपला जनता दरबार पुढे ढकलला होता.

बैठकीनंतर अजित पवार यांनी ट्विट केले. गेल्या अनेक दशकांपासून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड  शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वासू सहकारी, लोकप्रतिनिधी, पार्टी पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्याशी आज संवाद साधला. यावेळी शहरातील अनेक समस्या जाणून घेत,  त्या सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि एकजूट आपल्याला आगामी काळात नक्कीच अधिक बळकट करेल, असा विश्वास पवार यांनी या ट्विटद्वारे केला.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content