Homeब्लॅक अँड व्हाईटवर्णमुद्राचे 'मोहोळ'- कौशल्य...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले ‘मोहोळ’ हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि ‘भिडल्या’ त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. ‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!

मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे कौतुक करण्यात शहाणपण नसून वेडेपणाच दिसतोय, असं तुम्ही म्हणालही! हल्ली काय, कुणीही कुणावर काही काही बोलत असतात.. शेगाव मुक्कामी असलेल्या या प्रकाशन संस्थेने पोस्टाने पुस्तक पाठवण्याचा जणू वस्तुपाठच घेतला आहे असे म्हणा ना! ब्राऊन पेपरच्या वेष्टनात नीट बंदोबस्तात पाठवलेली पुस्तके तुम्ही-आम्ही सर्वांनीच पाहिलेली आहेत. परंतु वर्णमुद्राने छोटेखानी बॉक्समधून हे पुस्तक पाठवलेले आहे. म्हणूनच वर्णमुद्राचे मनोज पाठक यांचं मुद्दामहून कौतुक. अशा देखण्या पोस्टेजने मला आलेलं हे पहिलं पुस्तक व तेही मित्र असलेल्या सहकाऱ्याचं!!

“कोई फुल धूप की पत्तीयों मे हरे रिबन मे बंधा हुआ

वो गजल का लहजा नया नया

न कहा हुआ न सुना हुआ” (बशीर बद्र)

‘मोहोळ’ वाचण्यापूर्वी हे सहजंच हे सुचलं…

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...

न्यायालयात शब्दांना धार, बोरूही चालतो.. पण हातचं राखून!

ठाणे शहरात नुकतेच शहरातील 'वाहतूक लोककेंद्री कशी असावी' यावर एक चर्चासत्र होते. या सत्रात दिगज्ज वक्ते होते. सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्या. अभय ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अ. पा. देशपांडे व नगर रचनाकार सुलक्षणा महाजन आदी तगडे वक्ते होते....

न्यायमूर्तींचे निरीक्षण मोदी सरकारच्या अंगाशी!

अखेर अडीच-तीन महिन्यांच्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाच! त्यासाठी विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर चार दिवस आंदोलन करावे लागले, लाठीमर खावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना तर दिल्ली पोलिसांनी बदडून काढलेले जनतेने पाहिले. (विद्यार्थ्यांनीही पोलिसांना मारले...
Skip to content