Homeएनसर्कलपावसाळ्यासाठी परिवहन मंत्रालयाचा...

पावसाळ्यासाठी परिवहन मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष सज्ज!

मान्सून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष संपूर्ण पावसाळ्यात चोवीस तास कार्यरत असेल (दूरध्वनी  क्र. 011-23718525 https://morth.nic.in).

देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या परीचालनावर अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्या, उदा., वाहतूक विस्कळीत होणे, खराब दृश्यमानता आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात, पाणी साचणे, रस्त्यावरील अडथळे आणि दरडी कोसळणे, इत्यादी समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नियंत्रण कक्षाच्या कर्तव्यतत्परतेसाठी समर्पित चमू तैनात करण्यात आले आहेत जेणेकरून सार्वजनिक तसेच सरकारी संस्थांकडून आलेले कॉल प्राप्त करणे आणि राष्ट्रीय महामार्गांच्या परीसंचालनाशी संबंधित पावसाळ्याशी संबंधित घटनांसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्लॅटफॉर्मवर देखरेख समाविष्ट आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे किंवा नुकसानीशी संबंधित समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि राष्ट्रीय महामार्ग आणि संरचना विकास कार्यालय (एनएचआयडीसीएल)यांच्या संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे नियंत्रण कक्षातील चमूंना बंधनकारक करण्यात आले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content