Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेची पथके...

मुंबई महापालिकेची पथके रायगड व कोल्हापूरला रवाना

रायगड आणि कोल्हापूरमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडून काल रात्री दोन पथके मुंबईहून रवाना झाली. यात आरोग्य आणि जल तसेच घनकचरा व्यवस्थापनविषयक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई महापालिका आपत्कालीन परिस्थितीत पालिका क्षेत्राबाहेरदेखील तत्परतेने मदतकार्य करीत असते. याच अनुषंगाने काल मुंबई महापालिकेची २ पथके रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. रायगड व कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त  (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेचा एक पथक रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदतकार्य करण्यास रवाना झाले आहे. यामध्ये दोन वैद्यकीय चमू, १ फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे ४ टँकर, १ टोईंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे. वैद्यकीयविषयक बाबींचे व्यवस्थापन पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनविषयक कार्यवाही पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.

कोल्हापूर येथील पूरबाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्साःरण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पालिकेची आणखी एक टीम कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीदेखील पाठविण्यात आली आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.

२०१९मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही महापालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content