Homeन्यूज अँड व्ह्यूजराष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांना...

राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांना 15 जुलैपर्यंत संधी

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024साठी पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन स्व-नामांकन 27 जून 2024पासून शिक्षण मंत्रालयाच्या http://nationalawardstoteachers.education.gov.in या पोर्टलवर मागविण्यास सुरूवात झाली असून ऑनलाईन स्व-नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 आहे. यावर्षी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे 50 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या शिक्षकदिनी 5 सप्टेंबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

कठोर, पारदर्शक आणि ऑनलाईन निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी शिक्षकदिनी 5 सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशातील शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे आणि ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे, त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा उद्देश आहे.

शिक्षक

यासाठीचे पात्रता निकष:

राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश प्रशासन, स्थानिक संस्था आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश मंडळाशी संलग्न असलेल्या खाजगी शाळांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक / उच्च / उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणारे शालेय शिक्षक आणि शाळा प्रमुख पुरस्कारासाठी पात्र आहेत.

केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा, उदा. केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालय, संरक्षण मंत्रालय संचालित सैनिक शाळा, अणुऊर्जा शिक्षण संस्थाद्वारे संचालित शाळा आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित शाळा (CBSE) आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेशी (CISCE) संलग्न शाळांमध्ये काम करणारे शिक्षक या पुरस्काराकरीता पात्र असतील.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content