Homeटॉप स्टोरीमंत्र्यांबरोबरची चर्चा यशस्वी!...

मंत्र्यांबरोबरची चर्चा यशस्वी! निवासी डॉक्टरांचा संप मागे!!

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर केलेल्या चर्चेला यश आल्यानंतर या डॉक्टरांच्या उपस्थितीतच महाजन यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेला संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.

निवासी डॉक्टरांच्या काही प्रमुख मागण्यांबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल. त्यात सकारात्मक निर्णय होईल. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत १४३२ पदे भरली जातील. डॉक्टरांचे विविध प्रकारचे देणे लवकरात लवकर अदा केले जाईल असे विविध निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी संप पुकारण्यापूर्वी आपल्याबरोबर चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती. कारण पाच वर्षे आपल्याला वैद्यकीय शिक्षण खात्याचा कारभार चालवण्याची माहिती असल्यामुळे यावर सहज मार्ग निघू शकला असता. परंतु आताही चर्चा होऊन मार्ग निघाला, हे चांगले झाले असेही ते म्हणाले.

आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारपासून हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन कायम सुरू ठेवावे ही मागणी करतानाच, संसदेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा कायदा मंजूर करण्यात आला त्याला विरोध दर्शवण्यासाठी 16 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला होता. यावर मार्ग निघाला नाही तर गुरुवारपासून अत्यावश्यक सेवाही बंद करावी लागेल असा इशारा डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने दिला होता.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content