Homeटॉप स्टोरीमंत्र्यांबरोबरची चर्चा यशस्वी!...

मंत्र्यांबरोबरची चर्चा यशस्वी! निवासी डॉक्टरांचा संप मागे!!

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर केलेल्या चर्चेला यश आल्यानंतर या डॉक्टरांच्या उपस्थितीतच महाजन यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेला संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.

निवासी डॉक्टरांच्या काही प्रमुख मागण्यांबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल. त्यात सकारात्मक निर्णय होईल. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत १४३२ पदे भरली जातील. डॉक्टरांचे विविध प्रकारचे देणे लवकरात लवकर अदा केले जाईल असे विविध निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी संप पुकारण्यापूर्वी आपल्याबरोबर चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती. कारण पाच वर्षे आपल्याला वैद्यकीय शिक्षण खात्याचा कारभार चालवण्याची माहिती असल्यामुळे यावर सहज मार्ग निघू शकला असता. परंतु आताही चर्चा होऊन मार्ग निघाला, हे चांगले झाले असेही ते म्हणाले.

आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारपासून हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन कायम सुरू ठेवावे ही मागणी करतानाच, संसदेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा कायदा मंजूर करण्यात आला त्याला विरोध दर्शवण्यासाठी 16 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला होता. यावर मार्ग निघाला नाही तर गुरुवारपासून अत्यावश्यक सेवाही बंद करावी लागेल असा इशारा डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने दिला होता.

Continue reading

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...
Skip to content