Homeटॉप स्टोरीराष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही...

राष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही जण आता पक्षातही नाहीत!

राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या घटनात्मक चौकटच नव्हती. तेव्हा असलेली काही नावे आता पक्षातही नाही. अशा स्थितीत शरद पवार यांच्या गटाने केलेली कोणतीही कारवाई अधिकृत कारवाई म्हणून मानताच येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही घटना आहे या घटनेचे पालन करत आम्ही 30 जूनला झालेल्या बैठकीत काही निर्णय घेतले. त्यामध्ये माझी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यापाठोपाठ अजित पवार यांची पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून निवड झाली. अनिल पाटील यांची विधानसभेचे प्रतोद तर अमोल मिटकरी यांची विधान परिषदेचे प्रतोद म्हणून निवड करण्यात आली. त्याचदिवशी आम्ही सर्व प्रतिज्ञापत्रांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि पक्षाचे चिन्ह यांची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत घेतलेल्या आक्षेपाबद्दल निर्णय घेऊ शकतील. तोपर्यंत आमच्यावर कारवाई करण्याचे कोणत्याही अधिकार शरद पवार किंवा त्यांच्या पाठीराख्यांना नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी काल दिल्लीत बोलावलेली बैठक ही राष्ट्रवादीची अधिकृत बैठक नाही. पक्षाची निवडणूक ब्लॉक स्तरावरून अध्यक्षांपर्यंत अशा पद्धतीने होत असते. अशा पद्धतीची निवडणूक गेल्या काही वर्षांपासून झालीच नाही. झाल्या त्या फक्त नियुक्त्या. त्यामुळेच आमच्यावर हे कारवाई करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवालाही त्यांनी यावेळी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content