Homeटॉप स्टोरीराष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही...

राष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही जण आता पक्षातही नाहीत!

राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या घटनात्मक चौकटच नव्हती. तेव्हा असलेली काही नावे आता पक्षातही नाही. अशा स्थितीत शरद पवार यांच्या गटाने केलेली कोणतीही कारवाई अधिकृत कारवाई म्हणून मानताच येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही घटना आहे या घटनेचे पालन करत आम्ही 30 जूनला झालेल्या बैठकीत काही निर्णय घेतले. त्यामध्ये माझी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यापाठोपाठ अजित पवार यांची पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून निवड झाली. अनिल पाटील यांची विधानसभेचे प्रतोद तर अमोल मिटकरी यांची विधान परिषदेचे प्रतोद म्हणून निवड करण्यात आली. त्याचदिवशी आम्ही सर्व प्रतिज्ञापत्रांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि पक्षाचे चिन्ह यांची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत घेतलेल्या आक्षेपाबद्दल निर्णय घेऊ शकतील. तोपर्यंत आमच्यावर कारवाई करण्याचे कोणत्याही अधिकार शरद पवार किंवा त्यांच्या पाठीराख्यांना नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी काल दिल्लीत बोलावलेली बैठक ही राष्ट्रवादीची अधिकृत बैठक नाही. पक्षाची निवडणूक ब्लॉक स्तरावरून अध्यक्षांपर्यंत अशा पद्धतीने होत असते. अशा पद्धतीची निवडणूक गेल्या काही वर्षांपासून झालीच नाही. झाल्या त्या फक्त नियुक्त्या. त्यामुळेच आमच्यावर हे कारवाई करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवालाही त्यांनी यावेळी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content