Homeटॉप स्टोरीराष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही...

राष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही जण आता पक्षातही नाहीत!

राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या घटनात्मक चौकटच नव्हती. तेव्हा असलेली काही नावे आता पक्षातही नाही. अशा स्थितीत शरद पवार यांच्या गटाने केलेली कोणतीही कारवाई अधिकृत कारवाई म्हणून मानताच येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही घटना आहे या घटनेचे पालन करत आम्ही 30 जूनला झालेल्या बैठकीत काही निर्णय घेतले. त्यामध्ये माझी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यापाठोपाठ अजित पवार यांची पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून निवड झाली. अनिल पाटील यांची विधानसभेचे प्रतोद तर अमोल मिटकरी यांची विधान परिषदेचे प्रतोद म्हणून निवड करण्यात आली. त्याचदिवशी आम्ही सर्व प्रतिज्ञापत्रांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि पक्षाचे चिन्ह यांची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत घेतलेल्या आक्षेपाबद्दल निर्णय घेऊ शकतील. तोपर्यंत आमच्यावर कारवाई करण्याचे कोणत्याही अधिकार शरद पवार किंवा त्यांच्या पाठीराख्यांना नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी काल दिल्लीत बोलावलेली बैठक ही राष्ट्रवादीची अधिकृत बैठक नाही. पक्षाची निवडणूक ब्लॉक स्तरावरून अध्यक्षांपर्यंत अशा पद्धतीने होत असते. अशा पद्धतीची निवडणूक गेल्या काही वर्षांपासून झालीच नाही. झाल्या त्या फक्त नियुक्त्या. त्यामुळेच आमच्यावर हे कारवाई करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवालाही त्यांनी यावेळी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content