Homeएनसर्कलमॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय...

मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची लक्षणीय झेप

भारतीय संघाने 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गणितात अपवादात्मक कौशल्य आणि चिकाटीचे प्रदर्शन करत, चार सदस्यीय भारतीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. ऐतिहासिक कामगिरी करत या स्पर्धेत भारतीय स्पर्धकाने प्रथमच सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने 67 सहभागी देशांमध्ये सहावे स्थान पटकाविले. 2015मध्ये ऑलिम्पियाडमध्ये पदार्पण केल्यापासून भारताची ही सर्वोच्च क्रमवारी आणि कामगिरी आहे. ही स्पर्धा 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत फ्रान्समधील बोर्दोमध्ये आयोजित करण्यात आली होती.

पदकविजेत्या मुलींची नावे पुढीलप्रमाणे-

अनुक्रमांक  नाव राज्यपुरस्कार
1श्रेया मुंदडामुंबई, महाराष्ट्रसुवर्णपदक
2संजना चॅकोकेरळरौप्यपदक
3शिवानी कुमारतमिळनाडूकांस्यपदक

भारतीय संघाचे नेतृत्त्व डॉ. वैदेही थत्ते (नेता), डॉ. मृदुल थत्ते (उपनेता) आणि अदिती मुठखोड (निरीक्षक) यांनी केले. विशेष म्हणजे, भारताने या स्पर्धेसाठी संपूर्ण महिला संघ पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे. या स्पर्धेत 67 देशांच्या 260 विद्यार्थिंनींनी भाग घेतला. यामध्ये 42 युरोपीय देशांमधील 161 सहभागींचा समावेश आहे. भारत 2015पासून या ऑलिम्पियाडमध्ये अतिथी राष्ट्र म्हणून सहभागी होत आहे. भारतीय स्पर्धकांना माजी ऑलिम्पियन, अग्रगण्य गणित संशोधन संस्थांमधील संशोधक आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांचे सहाय्य असून, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत राष्ट्रीय उच्च गणित मंडळ यांचे सातत्यपूर्ण पाठबळ आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content