Homeकल्चर +'सजना'चे 'आभाळ रातीला..'...

‘सजना’चे ‘आभाळ रातीला..’ प्रेक्षकांसमोर!

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला. प्रेम, नातेसंबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट “सजना” या चित्रपटातील नवीन गाणं “आभाळ रातीला” प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम ही भावना केवळ शब्दांतून नाही तर सूरांतूनही अनुभवता येते. ‘आभाळ रातीला ’ हे गाणं त्या प्रेमभावनेचा एक सुंदर अनुभव आहे. मराठी संस्कृतीच्या ठेव्याला उजाळा देणारा आणि परंपरेचा अभिमान जागवणारा हे गाणं आहे. या गाण्यात ढोल-ताशाचा गगनभेदी नाद, लेझीमच्या तालावर अस्सल मराठी पोशाखामध्ये नाचणारी तरुणाई आणि मुख्य अभिनेते आणि देवीच्या मंगलमय स्तुतीचा संगम रसिकांना अनुभवता येतो.

गाण्याच्या चित्रिकरणातदेखील मोठ्या मिरवणुका, ढोल-ताशाचे पथक आणि सजीव लेझीम नृत्य यांचा भव्य प्रदर्शन करण्यात आलं आहे. हे गाणे केवळ मनोरंजन नसून मराठी संस्कृतीच्या गाढ प्रेमाचा आणि परंपरेच्या जपणुकीचा एक सुंदर सोहळा आहे ज्याच्या प्रत्येक ठोक्यातून मराठी अस्मिता झळकते. सुहास मुंडे यांच्या शब्दरचनेमुळे गाण्यात प्रेमभावना अधिक खुलून आल्या आहेत. गाण्याचे चित्रिकरणसुद्धा अतिशय नयनरम्य आहे. ह्या गाण्याचे संगीतकार ओंकारस्वरूप हे आहेत तर गायक आदर्श शिंदे आणि राजेश्वरी पवार हे आहेत.

या गाण्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. शशिकांत धोत्रेंचा हा पहिलाच रोमँटिक सिनेमा आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा त्यांचेच आहे. हा सिनेमा येत्या २३ मेपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content