Homeटॉप स्टोरीकंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक...

कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक फक्त दीड महिन्यांसाठी!

शिक्षक भरतीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून काही काळासाठी स्थगिती दिली गेली होती. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारची भरती आपण सुरू केली. आता ही स्थगिती उठलेली आहे. भरतीचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. त्यामुळे कंत्राटावरील सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा जास्तीतजास्त एक ते दीड महिना चालेल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

राज्यातले शिक्षण आणि शिक्षक या विषयावर सतीश चव्हाण यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली होती. शिक्षणामध्ये देशात याआधी दुसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता सातव्या क्रमांकावर गेला आहे, असे ते म्हणाले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याला उत्तर दिले. केंद्र सरकारने आता वर्गीकरणाची पद्धत बदलल्यामुळे महाराष्ट्राचा क्रमांक सातवा लागला आहे. यातील तपशीलवार माहिती अशी आहे की, पहिल्या पाच क्रमांकावर एकही राज्य नाही आणि सहाव्या क्रमांकावर चंदीगड आणि पंजाब या दोघांचा समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्रासह इतर सर्व राज्ये सातव्या क्रमांकावर आहेत, असे ते म्हणाले.

राज्य सरकार नव्या दमाचे तयार झालेले शिक्षक सोडून सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीवर घेत आहे, याबद्दल सुधाकर अडबाले यांनी सरकारवर टीका केली. त्याला उत्तर देताना केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर केले. जिल्हा परिषदांकडून 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट यादरम्यान रोस्टर व बिंदू नामावली निश्चित करून जाहिराती दिल्या जातील. एक सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. 10 ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. 11 ते 21 ऑक्टोबरदरम्यान नेमणुका होतील. त्यानंतर 21 ऑक्टोबरपासून 24 ऑक्टोबरपर्यंत नव्याने दाखल होणाऱ्या शिक्षकांना शिक्षकांचे कौन्सिलिंग केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content