Homeटॉप स्टोरीसहारा ठेवीदारांचे 5000...

सहारा ठेवीदारांचे 5000 कोटी देण्यासाठी रिफंड पोर्टल!

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा मंगळवारी नवी दिल्लीत ‘सीआरसीएस-सहारा रिफंड पोर्टल’ चा प्रारंभ करत आहेत. सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लि., सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लि., हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. या सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या खऱ्या ठेवीदारांना वैध दावे सादर करता यावेत यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

हे नमूद करणे योग्य ठरेल की सहारा समूहाच्या सहकार संस्थांच्या प्रामाणिक सभासद/ठेवीदारांच्या वैध ठेवींचे पैसे परत करण्यासंबंधीच्या त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहकार मंत्रालयाने देशातील सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सहारा समुहाच्या सहकारी संस्थांच्या ठेवीदारांची उचित देणी परत करण्यासाठी 5000 कोटी रुपये “सहारा-सेबी रिफंड अकाउंट” मधून सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांना (सीआरसीएस) हस्तांतरित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने 29 मार्च 2023 रोजी आपल्या आदेशाद्वारे निर्देश दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार मंत्रालयाने त्याच्या स्थापनेपासून देशातील सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी आणि सहकारी संस्थांच्या सदस्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content