Homeकल्चर +‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्रीरंग फडके यांनी लिहिलेल्या ‘रानसावल्या’, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर येथे होत आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (वन्यजीव) डॉ. विनया जंगले प्रमुख अतिथी तसेच ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लेखक श्रीरंग फडके यांचे ‘रानसावल्या’ हे पुस्तक गोव्याच्या ब्रॉडवे प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकास गोव्यातील ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात १४ कथा/लेख/निबंध असून लेखकाच्या अनुभवावरून त्या नोंदल्या आहेत. त्यातले काही लेखकाचे स्वतःचे अनुभव असून काही ऐकलेल्या गोष्टी आहेत. काही कथा काल्पनिक असून सत्याच्या जवळ जाणाऱ्या आहेत. काही व्यक्तिचित्रे आहेत. थोडक्यात म्हणायचं झाल्यास हे निसर्गसाहित्य आहे. मराठी भाषेतल्या निसर्ग साहित्यात आजवर अनेक मातब्बर लोकांनी आपापले अनुभव, लेख, कथा लिहिल्या आहेत. त्यांचा वारसा लिखित स्वरूपात पुढे चालू ठेवण्यासाठी छोटं योगदान असावं म्हणून हे निसर्ग अनुभवांचं लिखाण वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

या पुस्तकाचं मूल्य रुपये ४००/- असून प्रकाशनाच्या दिवशी प्रकाशनस्थळी वाचकांसाठी ते रुपये ३५०/- ला दिले जाईल. अधिक माहितीसाठी किंवा पुस्तकासाठी लेखक श्रीरंग फडके यांच्याशी ९९२०३९०१०९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा shreerang.kanha@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content