Homeएनसर्कलमध्य भारताला पावसाने...

मध्य भारताला पावसाने झोडपले, बिहारमध्ये दोन दिवसांत ८२ बळी!

भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मुसळधार पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जीवितहानी झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे.

गेले दोन दिवस बिहारच्या नालंदा आणि आसपासच्या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. नालंदा जिल्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मतदारसंघ आहे. बुधवारी झाडे तसेच विजा कोसळून बिहारमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. काल अशाच घटनांमध्ये ६१ जणांचा बळी गेल्याचे बोलले जाते. येत्या तीन दिवसांत तेथील हवामानात काडीचाही बदल होण्याची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहवे, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, उत्तराखंडमध्येही काल तुफान वृष्टी झाल्यामुळे चमोली परिसरातील पाण्याचे लोट आणि त्याबरोबर वाहून जाणारा गाळ नंदप्रयाग बाजारापर्यंत पोहोचला. आज सकाळी तेथे मदतकार्य करताना रस्त्यावरील चिखल दूर करून ते मोकळे केले जात होते.

Continue reading

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...
Skip to content