Homeएनसर्कलमध्य भारताला पावसाने...

मध्य भारताला पावसाने झोडपले, बिहारमध्ये दोन दिवसांत ८२ बळी!

भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मुसळधार पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जीवितहानी झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे.

गेले दोन दिवस बिहारच्या नालंदा आणि आसपासच्या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. नालंदा जिल्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मतदारसंघ आहे. बुधवारी झाडे तसेच विजा कोसळून बिहारमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. काल अशाच घटनांमध्ये ६१ जणांचा बळी गेल्याचे बोलले जाते. येत्या तीन दिवसांत तेथील हवामानात काडीचाही बदल होण्याची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहवे, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, उत्तराखंडमध्येही काल तुफान वृष्टी झाल्यामुळे चमोली परिसरातील पाण्याचे लोट आणि त्याबरोबर वाहून जाणारा गाळ नंदप्रयाग बाजारापर्यंत पोहोचला. आज सकाळी तेथे मदतकार्य करताना रस्त्यावरील चिखल दूर करून ते मोकळे केले जात होते.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content