Homeटॉप स्टोरीरेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस...

रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचे वेतन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत, आर्थिक वर्ष 2022-23 साठी सर्व पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य पीएलबी म्हणजेच उत्पादनाशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने 11,07,346 रेल्वे कर्मचाऱ्यांना 1968.87 कोटी रुपयांचा उत्पादनाशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी दिली आहे.

यामध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन व्यवस्थापक (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयातील कर्मचारी वर्ग आणि इतर गट ‘क’ कर्मचारी (आर पी एफ /आर पी एस एफ कर्मचारी वगळून) यांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रेल्वेची कामगिरी अत्यंत उत्तम राहिली. रेल्वेने 1509 दशलक्ष टन इतकी विक्रमी मालवाहतूक आणि जवळपास 6.5 अब्ज प्रवाशांची वाहतूक केली.

या विक्रमी कामगिरीसाठी अनेक घटकांचे योगदान लाभले आहे. यामध्ये केंद्र सरकारने रेल्वेतील पायाभूत सेवांमध्ये भांडवली खर्चासाठी केलेली विक्रमी गुंतवणूक, कार्यक्षमतेतील सुधारणा आणि उत्तम तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे. उत्पादनाशी निगडीत बोनसमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीत अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content