Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच...

उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच राहुल गांधी ‘मातोश्री’वर!

उद्धव ठाकरे यांनी आधी दिल्ली गाठावी. त्यानंतरच राहुल गांधी मुंबईत येतील, असे काल काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

स्वा. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्ये, पक्षाच्या इतर नेत्यांकडून होणारे त्याचे समर्थन, सावरकरांबद्दल उद्धव ठाकरे गटाची भूमिका, अशा विविध परस्परविरोधी भूमिकांचा महाविकास आघाडीवर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी काल रात्री वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर वेणूगोपाल तसेच उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे एका पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी वेणूगोपाल यांना राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीबाबत विचारले असता त्यांनी इतक्यात ही भेट होण्याची शक्यताच नसल्याचे सूचित केले. आम्ही उद्धव ठाकरे यांना दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या भेटीसाठी यावे. तसे निमंत्रण आम्ही त्यांना दिले आहे. त्यांची दिल्लीवारी झाल्यावर राहुल गांधी निश्चितच मुंबई गाठतील, अशा आशयाचे विधानही वेणूगोपाल यांनी केले. 

मीकरणाविरोधातील समीकरण – उद्धव ठाकरे

यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा भेटीचा उद्देश वेणूगोपाल यांनी स्पष्ट केला. देशात मीकरणाच्या विरोधात एक समीकरण म्हणून सर्व पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात. म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत.

मागे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला सत्तेचा हव्यास आहे. ते सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो. एक नाते निर्माण होते. भाजपसोबत २५-३० वर्षं होतो. पण होतो… त्यांना किंमत नव्हती. ठिक आहे. त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत. ते आम्हाला साथ देतील, असेही ठाकरे म्हणाले.

Continue reading

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...
Skip to content