Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच...

उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच राहुल गांधी ‘मातोश्री’वर!

उद्धव ठाकरे यांनी आधी दिल्ली गाठावी. त्यानंतरच राहुल गांधी मुंबईत येतील, असे काल काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

स्वा. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्ये, पक्षाच्या इतर नेत्यांकडून होणारे त्याचे समर्थन, सावरकरांबद्दल उद्धव ठाकरे गटाची भूमिका, अशा विविध परस्परविरोधी भूमिकांचा महाविकास आघाडीवर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी काल रात्री वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर वेणूगोपाल तसेच उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे एका पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी वेणूगोपाल यांना राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीबाबत विचारले असता त्यांनी इतक्यात ही भेट होण्याची शक्यताच नसल्याचे सूचित केले. आम्ही उद्धव ठाकरे यांना दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या भेटीसाठी यावे. तसे निमंत्रण आम्ही त्यांना दिले आहे. त्यांची दिल्लीवारी झाल्यावर राहुल गांधी निश्चितच मुंबई गाठतील, अशा आशयाचे विधानही वेणूगोपाल यांनी केले. 

मीकरणाविरोधातील समीकरण – उद्धव ठाकरे

यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा भेटीचा उद्देश वेणूगोपाल यांनी स्पष्ट केला. देशात मीकरणाच्या विरोधात एक समीकरण म्हणून सर्व पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात. म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत.

मागे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला सत्तेचा हव्यास आहे. ते सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो. एक नाते निर्माण होते. भाजपसोबत २५-३० वर्षं होतो. पण होतो… त्यांना किंमत नव्हती. ठिक आहे. त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत. ते आम्हाला साथ देतील, असेही ठाकरे म्हणाले.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content