Homeटॉप स्टोरीराहुल गांधींनी आळवला...

राहुल गांधींनी आळवला पुन्हा ‘जेपीसी’चा राग!

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या चीनच्या नागरिकाला भागीदार म्हणून घेणाऱ्या अदानी समुहाच्या आर्थिक व्यवहारांची जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केली.

आजपासून मुंबईच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 28 पक्षांच्या इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीसाठी आल्यानंतर एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. ब्रिटनच्या एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, गौतम अदानींचे बंधू विनोद अदानी आणि त्यांच्या दोघा भागीदारांनी भारतातून एक बिलियन डॉलर परदेशात पाठवले. त्यानंतर हेच पैसे पुन्हा भारतात आले. हे पैसे कोणाचे आहेत? ते जर अदानींचे असतील तर तसे  स्पष्ट करा. नाही तर ते कोणाचे आहेत, यामागे मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे.

अदानी समुहातल्या या दोन भागीदारांपैकी एक भागीदार चँग चुग लिंग चीनचा भागीदार असून चीन हे भारतासाठी धोकादायक राष्ट्र आहे. अदानी संरक्षण मंत्रालयातही कामे घेतात. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. मग अशावेळी या साऱ्या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सेबीने अदानी समुहाला क्लीन चिट दिलेली आहे. ही क्लीन चिट देणारे तत्कालीन अध्यक्ष आता अदानींच्या एका वृत्तवाहिनीच्या संचालकपदावर काम करत आहेत. त्यामुळे या चौकशीबद्दल संशय व्यक्त होत आहे. त्यामुळेच अदानी समुहाच्या व्यवहारांची जेपीसीमार्फत चौकशी केली गेली पाहिजे, अशी आग्रही मागणी राहुल गांधी यांनी केली.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content