Homeपब्लिक फिगरराजस्थानमध्ये पंतप्रधानांनी केले...

राजस्थानमध्ये पंतप्रधानांनी केले ६ एकलव्य निवासी शाळांचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील उदयपूर (2), बांसवाडा (2), प्रतापगड (1) आणि डुंगरपूर या जिल्ह्यातील सहा एकलव्य आदर्श निवासी शाळांचे नुकतेच उद्घाटन केले. या शाळांच्या बांधकामामुळे 2880 आदिवासी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यात विद्यार्थिनींची संख्या अर्धी आहे.

अनेक दशकांपासून खेड्यांमध्ये चांगल्या शाळा आणि शिक्षणाच्या अभावामुळे खेडी आणि गरीब लोक मागे पडल्याचे पंतप्रधान म्हणाले आणि मागासलेल्या आणि आदिवासी समाजातील मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतेही साधन नव्हते याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, सध्याच्या सरकारने शिक्षणासाठी आर्थिक तरतूद आणि संसाधने वाढवली आणि एकलव्य निवासी शाळा उघडल्या ज्याचा आदिवासी तरुणांना मोठा फायदा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, 50% किंवा 20,000 हून अधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या आदिवासी तालुक्यात प्रत्येकी एक प्रमाणे 740 एकलव्य निवासी आदर्श शाळा स्थापन केल्या जात आहेत. 2021-22 मध्ये 452 नवीन मैदानी आणि डोंगराळ भागातील एकलव्य आदर्श निवासी शाळांसाठी बांधकामाची किंमत अनुक्रमे 20 कोटी आणि 24 कोटी रुपयांवरून वाढवून 38 कोटी आणि 48 कोटी रुपये करण्यात आली. पुढील 3 वर्षांत टप्प्याटप्प्याने 38,000 हून अधिक शिक्षकांची भर्ती केली जाईल. 2013-14 मध्ये 167 शाळांना मंजुरी देण्यात आली होती, ज्या आजपर्यंत 693 पर्यंत वाढल्या आहेत. 2013-14 मध्ये 119 शाळा कार्यरत होत्या, तर आजमितीस 401 शाळा कार्यरत आहेत, गेल्या 5 वर्षात 110 शाळांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content