Homeएनसर्कलवर्ल्ड फूड इंडिया...

वर्ल्ड फूड इंडिया संमेलनाचे तयारी शिबीर नाशिकमध्ये संपन्न!

नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसह (केसीसीआय I) केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने नाशिक येथे अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रांच्या प्रादेशिक उद्योग संमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे 3-5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार्‍या वर्ल्ड फूड इंडिया 2023 हा या प्रादेशिक संमेलनाचा मुख्य विषय होता. या भव्य कार्यक्रमात नाशिकमधील उद्योग हितधारकांचा सहभाग असणार आहे.

या संमेलनाला उपस्थित प्रमुख पाहुणे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सनोज कुमार झा यांनी नाशिकच्या अन्न प्रक्रिया उद्योगाच्या हितधारकांशी संवाद साधला आणि त्यांना वर्ल्ड फूड इंडिया 2023 मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. अन्न प्रक्रिया उद्योगातील हितधारकांशी संवाद साधण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी उत्पादक, अन्न प्रक्रिया करणारे, वाईनवर प्रक्रिया करणारे, उपकरणे उत्पादक, लॉजिस्टिक कंपन्या, शीतसाखळी कंपन्या, तंत्रज्ञान प्रदाते, अकादमी, स्टार्ट-अप्स आणि नवोन्मेषक, अन्न किरकोळ विक्रेते इ.सर्व हितधारकांना एक अनोखे व्यासपीठ देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे या भव्य खाद्यपदार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, असे सनोज कुमार झा यांनी अधोरेखित केले.

हा कार्यक्रम मान्यवरांची, जागतिक गुंतवणूकदारांची आणि प्रमुख जागतिक आणि देशांतर्गत खाद्य कंपन्यांच्या व्यावसायिक प्रमुखांची आजवरची सर्वात मोठी परिषद असणार आहे, ही परिषद भारताला जागतिक खाद्यपदार्थांच्या परिदृश्यावर ठळकपणे आणेल, असे ते म्हणाले.

या संमलेनाला प्रादेशिक संघटना आणि उद्योगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अतिशय महत्त्वाच्या प्रादेशिक उद्योग संमेलनात एकूण 70 उद्योग सहभागी झाले होते.

महाराष्ट्र सरकारचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी देखील नाशिकस्थित अन्न प्रक्रिया उद्योगांना स्थानिक ते जागतिक दृष्टीकोन प्राप्त करण्याच्या दृष्टीने वर्ल्ड फूड इंडिया 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे संचालक संजय कुमार सिंह; इन्व्हेस्ट इंडियाच्या वरिष्ठ गुंतवणूक विशेषज्ञ राधिका मेहता; फिक्कीच्या व्यापार व्यवहार विभागाचे सहसंचालक मयंक रस्तोगी या संमेलनात संवाद साधण्यासाठी उपस्थित होते.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content