Homeकल्चर +काही ग्रहांमधील योगाच्या...

काही ग्रहांमधील योगाच्या स्थित्यंतराने येते नैसर्गिक आपत्ती!

प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी नक्षत्रांचे गुणधर्म ओळखून सत्त्वगुणी नक्षत्रांना देवगणी, राजसिक नक्षत्रांना मनुष्यगणी आणि तमोगुणी नक्षत्रांना राक्षसगणी अशा संज्ञा दिल्या आहेत. राक्षसगणी नक्षत्रे ही व्यक्तीगत सौख्याच्या दृष्टीने साधारणपणे प्रतिकूल ठरतात. परंतु कर्तृत्त्व, अधिकार, प्रतिष्ठा आणि भौतिक उत्कर्ष यादृष्टीने अनुकूल ठरतात. मेदिनीय (राष्ट्रीय) ज्योतिषात राक्षसगणी नक्षत्रांची (कृत्तिका, धनिष्ठा, मूळ इत्यादी तमोगुणी नक्षत्रांची) भूमिका महत्त्वाची ठरते. गुरू, शनि, हर्षल आदी मोठ्या ग्रहांमधील योग जेव्हा राक्षसगणी नक्षत्रांमध्ये होतात, तेव्हा राष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती, राजकीय स्थित्यंतरे, युद्ध अशा घटना घडतात, असे प्रतिपादन ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी नुकतेच केले.

ते ऑनलाईन ‘ज्योतिष कट्टा व्याख्यानमाले’त ‘राक्षसगणी नक्षत्रांची वैशिष्ट्ये’ या विषयावर बोलत होते. ‘फल ज्योतिष अभ्यास मंडळ, पुणे’ यांनी या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. गेल्या ५०-६० वर्षांत भारतात घडलेल्या ठळक घटनांचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून वेध घेताना आम्हाला लक्षात आले, असेही महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी सांगितले.

ज्योतिषशास्त्राच्या संवर्धनासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरू  डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ज्योतिषशास्त्रात संशोधन कार्य चालू आहे. जानेवारी २०२०पर्यंत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने देशभरात १४हून अधिक ज्योतिष अधिवेशनांमध्ये ज्योतिषशास्त्रावरील निबंध सादर करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

अनेक संतांनी सांगितल्यानुसार येणार्‍या काही वर्षांत भारतासह जगभरात भीषण आपत्काळ येणार आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादींच्या माध्यमातून मोठा जनसंहार होण्याची शक्यता आहे. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना करणे हाच एकमेव उपाय आहे. कलियुगात नामजप ही सर्वोत्तम साधना आहे, असे अनेक संतांनी सांगितले आहे, असेही कर्वे म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content