Homeबॅक पेजपेटीएमने केली ट्रॅव्‍हल...

पेटीएमने केली ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा

पेटीएम, या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने पेटीएम ट्रॅव्‍हल कार्निवलच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या ट्रॅव्‍हल कार्निवलदरम्‍यान ट्रॅव्‍हल बुकिंगवर विशेष फेस्टिव्‍ह सूट देण्‍यात येणार आहे. ५ ऑक्‍टोबरपर्यंत वापरकर्ते फ्लाइट्सवर जवळपास ५,००० रूपयांची बचत करू शकतात आणि बस बुकिंग्‍जवर २५ टक्‍के सूट म्‍हणजेच जवळपास ५०० रूपये बचतीचा आनंद घेऊ शकतात.

कंपनीने वापरकर्त्‍यांना अतिरिक्‍त बचत देण्‍यासाठी आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, बँक ऑफ बडोदा आणि एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक अशा आघाडीच्‍या बँकांसोबत सहयोग केला आहे. प्रवासी देशांतर्गत फ्लाइट्सवर जवळपास १५ टक्‍के सूट आणि आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सवर जवळपास १० टक्‍के सूटचा लाभ घेण्‍यासाठी प्रोमो कोड्सचा वापर करू शकतात, जसे आयसीआयसीआय बँकेसाठी ‘आयसीआयसीआयसीसी’, आरबीएल बँकेसाठी ‘फ्लायआरबीएल’, बँक ऑफ बडोदासाठी ‘बॉबसेल’ व एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेसाठी ‘एयूसेल’. तसेच, पेटीएमची तिकिट अशुअर सेवा कन्‍फर्म रेल्‍वे तिकिटांची खात्री देते, तर बुकिंग्‍ज यूपीआयच्‍या माध्‍यमातून विनाशुल्‍क दिली जातात. वापरकर्ते रेल्‍वे तिकिटांसाठी फक्‍त ४९ रूपयांपासून मोफत कॅन्‍सलेशनचादेखील अवलंब करू शकतात.

पेटीएमचे प्रवक्‍ता म्‍हणाले की, सणासुदीचा काळ जवळ आला असताना आणि देशभरातील लोक त्‍यांच्‍या मूळगावी किवा सुट्टीतील धमालीसाठी प्रवासाचे नियोजन करत असताना आम्‍हाला विशेष ऑफर्स सादर करण्‍याचा आनंद होत आहे. त्यामुळे त्‍यांचा प्रवास अधिक किफायतशीर व सुखकर होईल. आघाडीच्या बँकांसोबत सहयोगासह आमचा फ्लाइट्स, रेल्‍वे व बसेसवर बचत देण्‍याचा मानस आहे, ज्‍यामधून लाखो पेटीएम वापरकर्ते विनासायास प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content