Homeएनसर्कलमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा वेळ वाचणार!

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) च्या T2 टर्मिनलवर सिक्युरिटी चेकपॉईंट एरिया (एससीपी) अर्थात सुरक्षा तपासणी क्षेत्राच्या टप्पा 1 आणि टप्पा 2 चा विस्तार आणि आधुनिकीकरण पूर्ण झाला आहे. त्यामुळे विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे, परिणामी प्रतीक्षा कालावधी कमी होऊन प्रवाशांच्या सोयीसुविधेत वाढ झाली आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ला 3 टप्प्यांमध्ये विस्तार आणि अद्ययावतीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते ज्यात पहिला टप्पा हा 31 मार्च 2023 रोजी आणि दुसरा टप्पा 2 हा 30 जून 2023 रोजी पूर्ण झाला आहे. यामुळे टर्मिनलची क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त जागा निर्माण झाली आहे, ज्याद्वारे प्रवाशांची सुलभता वाढून गर्दी कमी होण्यास मदत सुनिश्चित होईल.

जागतिक कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी भारतीय विमान वाहतूक क्षेत्राने केलेल्या सुधारणा आणि लवचिकतेच्या अनुषंगाने, देशाने दैनंदिन प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ अनुभवली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे एक आकांक्षी भारत तयार झाला आहे जो उड्डाण करण्यास इच्छुक आणि सज्ज आहे. या मागणीला प्रतिसाद म्हणून, एमआयएएल ने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि बीसीएएस यांच्याशी सल्लामसलत करून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) च्या टर्मिनल 2 वर प्रवाशांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्याकरिता क्षमता वाढवण्यासाठी आणि अशा प्रकारच्या पहिल्या एकात्मिक एससीपी सुविधा अद्ययावत करण्यासाठी एक व्यापक योजना आखली आहे. प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी, प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अखंड परंतु सुरक्षित प्रवास अनुभव देण्यासाठी या धोरणात्मक उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. या कामाचा पहिला टप्पा सप्टेंबर 2022 मध्ये सुरू झाला आणि तीनपैकी दोन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि अपेक्षित परिणाम दिसण्यास सुरुवात झाली.

अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी, सीएसएमआयए ने प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक तैनात केले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुले/बालकांसह प्रवास करणारे आणि विशेषत: दिव्यांग प्रवाशांसाठी प्राधान्य मार्ग प्रदान केले आहेत.

एमआयएएल ने केलेल्या प्रगतीवर भाष्य करताना, नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले, प्रवाशांचे समाधान हे नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे आणि मला आनंद होत आहे की खाजगी विमानतळ ऑपरेटर सर्वांना विमान प्रवास सुलभ करण्यासाठी आमच्या आदेशात पूर्णपणे सहकार्य करत आहेत. एमआयएएल ने ही अतिरिक्त जागा निर्माण करून उत्तम काम केले आहे ज्यामुळे क्षमता वाढेल आणि प्रवाशांना सुविधा मिळेल. या प्रकल्पाचा टप्पा 3 पूर्ण झाल्याने यात आणखी वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहू आणि नागरिकांना सर्वोत्तम सेवा देऊ.”

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content