Homeटॉप स्टोरी'वक्फ दुरूस्ती'नंतर संसदेचे...

‘वक्फ दुरूस्ती’नंतर संसदेचे कामकाज संस्थगित

वादग्रस्त वक्फ कायदा दुरूस्ती विधेयकावर तब्बल दोन दिवसांत 24 तासांहून जास्त चर्चा केल्यानंतर तसेच पेटलेल्या मणिपूरला शांत करण्याकरीता तेथे राष्ट्रपती शासन लावण्याच्या विधेयकाला लोकसभा तसेच राज्यसभेत पहाटेपर्यंत झालेल्या चर्चेनंतर मंजुरी दिल्यानंतर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेची उत्पादकता अनुक्रमे सुमारे  118% आणि 119% राहिली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकंदर 16 विधेयके मंजूर केली.

शुक्रवार 31 जानेवारी, 2025 रोजी सुरू झालेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025, काल, शुक्रवार 4 एप्रिल, 2025 रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल संसदेच्या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषद घेऊन तिथे झालेल्या कामकाजाची माहिती दिली. अधिवेशनाच्या

पहिल्या सत्रात लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण 9 बैठका झाल्या. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही सभागृहांच्या 17 बैठका झाल्या. संपूर्ण अधिवेशनात एकूण 26 बैठका झाल्या, असे त्यांंनी सांगितले.

शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात दोन्ही सभागृहांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली. यावेळी लोकसभेत 12 तासांच्या दिलेल्या वेळेच्या तुलनेत 16 तास 13 मिनिटे चर्चा झाली आणि त्यात 169 सदस्यांनी चर्चेत भाग घेतला तर राज्यसभेत 15 तासांच्या दिलेल्या वेळेच्या तुलनेत 17 तास 56 मिनिटे चर्चा झाली. त्यामध्ये 89 सदस्यांनी भाग घेतला. लोकसभेने 25 मार्चला वित्त विधेयक, 2025 मंजूर केले. या अधिवेशनादरम्यान एकूण 11 विधेयके (लोकसभेत 10 आणि राज्यसभेत 1) सादर करण्यात आली. लोकसभेत 16 विधेयके मंजूर झाली आणि राज्यसभेत 14 विधेयके मंजूर/परत करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांची एकूण संख्या 16 आहे, असे रिजिजू म्हणाले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content