Homeटॉप स्टोरी'वक्फ दुरूस्ती'नंतर संसदेचे...

‘वक्फ दुरूस्ती’नंतर संसदेचे कामकाज संस्थगित

वादग्रस्त वक्फ कायदा दुरूस्ती विधेयकावर तब्बल दोन दिवसांत 24 तासांहून जास्त चर्चा केल्यानंतर तसेच पेटलेल्या मणिपूरला शांत करण्याकरीता तेथे राष्ट्रपती शासन लावण्याच्या विधेयकाला लोकसभा तसेच राज्यसभेत पहाटेपर्यंत झालेल्या चर्चेनंतर मंजुरी दिल्यानंतर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेची उत्पादकता अनुक्रमे सुमारे  118% आणि 119% राहिली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकंदर 16 विधेयके मंजूर केली.

शुक्रवार 31 जानेवारी, 2025 रोजी सुरू झालेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025, काल, शुक्रवार 4 एप्रिल, 2025 रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल संसदेच्या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषद घेऊन तिथे झालेल्या कामकाजाची माहिती दिली. अधिवेशनाच्या

पहिल्या सत्रात लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण 9 बैठका झाल्या. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही सभागृहांच्या 17 बैठका झाल्या. संपूर्ण अधिवेशनात एकूण 26 बैठका झाल्या, असे त्यांंनी सांगितले.

शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात दोन्ही सभागृहांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली. यावेळी लोकसभेत 12 तासांच्या दिलेल्या वेळेच्या तुलनेत 16 तास 13 मिनिटे चर्चा झाली आणि त्यात 169 सदस्यांनी चर्चेत भाग घेतला तर राज्यसभेत 15 तासांच्या दिलेल्या वेळेच्या तुलनेत 17 तास 56 मिनिटे चर्चा झाली. त्यामध्ये 89 सदस्यांनी भाग घेतला. लोकसभेने 25 मार्चला वित्त विधेयक, 2025 मंजूर केले. या अधिवेशनादरम्यान एकूण 11 विधेयके (लोकसभेत 10 आणि राज्यसभेत 1) सादर करण्यात आली. लोकसभेत 16 विधेयके मंजूर झाली आणि राज्यसभेत 14 विधेयके मंजूर/परत करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांची एकूण संख्या 16 आहे, असे रिजिजू म्हणाले.

Continue reading

जि.प. निवडणुकीत आंबेडकर, जानकरांपाठोपाठ शेंडगेही काँग्रेसबरोबर

महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीलाही बरोबर घेतले आहे. ही...

भाजपात निष्ठावंतांकडून उचल खाण्यास सुरूवात!

गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे. पक्षवाढ करताना वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेच पाहिजेत. पण त्यामुळे वर्षानुवर्षे संधीच्या आशेवर कार्यरत...

महाराष्ट्रात थंडीची लाट हळूहळू ओसरणार!

या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे...
Skip to content