Homeन्यूज ॲट अ ग्लांसवक्फनंतरची आज पहिली...

वक्फनंतरची आज पहिली जुम्मा नमाज! ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त!!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.

वक्फ बोर्डाच्या कायद्यात झालेल्या सुधारणांना बहुतांशी सर्वच मुस्लीम संघटनांनी तसेच विरोधी राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. या सुधारणांविरूद्ध आजच्या नमाजनंतर देशभरात मुसलमानांनी निदर्शने करावी, असे आवाहन अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच त्यांच्या धर्मगुरूंनी केले आहे. त्यामुळे आता नमाज संपल्यानंतर मुसलमानांकडून निदर्शने केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये ठिकठिकाणी पोलिसांनी ध्वजसंचलन केले. अनेक ठिकाणी राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच व्यक्तींनी वक्फ बोर्ड कायद्याच्या सुधारणांविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या सर्व याचिकांवर एकत्रितपणे १६ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या सुधारणांविरूद्ध सह्यांची मोहीमही राबविण्यात येत असून सुमारे एक कोटी सह्या याकरीता गोळा केल्या जाणार आहेत.

Continue reading

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...
Skip to content