Homeएनसर्कल316 लॉ कॉलेजपैकी...

316 लॉ कॉलेजपैकी 243ना बार कौन्सिलची मान्यताच नाही!

मुंबईसहित महाराष्ट्रात 316 अशी महाविद्यालये (कॉलेज) आहेत ज्या ठिकाणी विधिविषयक (लॉ, कायद्याचे) शिक्षण दिले जाते. परंतु त्यातल्या 243 महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताच नाही किंवा त्यांच्या परवानगीचे नूतनीकरण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशा महाविद्यालयांतील प्रवेश बंद करावेत, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, टिळक, शिवाजी, एसएनडीटी महिला, कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी, सावित्रीबाई फुले, उत्तर महाराष्ट्र अशा विद्यापीठांच्या अंतर्गत ही 316 विधि महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी 71 महाविद्यालयांकडे परवानगी आहे. 2 महाविद्यालये बंद आहेत. यात नामांकित गव्हर्मेंट लॉ कॉलेज, जितेंद्र चौहान लॉ कॉलेज, केसी लॉ कॉलेज, पद्मश्री डीवाय पाटील लॉ कॉलेज, सिद्धार्थ लॉ कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, रिझवी लॉ कॉलेज, एसएनडीटी लॉ कॉलेज, टिळक लॉ कॉलेज, मॉडर्न लॉ कॉलेज सिंबायोसिस लॉ कॉलेज, अंजुमन इस्लाम लॉ कॉलेज, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचा समावेश आहे.

सध्या बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा त्यांच्या परवानगीचे नूतनीकरण नसलेल्या विधि महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करत त्यांची मान्यता रद्द करावी. खरे पाहिले तर मुंबई विद्यापीठ किंवा अन्य विद्यापीठांनी आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व विधि महाविद्यालयाची प्रत्येक शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि परवानगीची माहिती संकलित करण्याची गरज आहे. विशेष करुन बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नूतनीकरण केल्याची कागदपत्रे प्रत्येक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्यास विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस सत्य परिस्थिती लक्षात येईल, असेही गलगली यांनी म्हटले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content