Homeबॅक पेजआयएनएस शारदाला 'ऑन...

आयएनएस शारदाला ‘ऑन दी स्पॉट युनिट प्रशस्तिपत्र’!

सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ओलिस ठेवलेल्या इराणी मासेमारी जहाज ओमारीवरील सर्व 19 सदस्यांची (11 इराणी आणि 08 पाकिस्तानी) सुरक्षित सुटका करण्यात सहभागी असलेल्या आयएनएस शारदाला चाचेगिरीविरोधातल्या यशस्वी कारवाईबद्दल नौदलप्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी दक्षिणी नौदल कमांड, कोची येथील भेटीदरम्यान, ‘ऑन दी स्पॉट युनिट प्रशस्तिपत्र’ नुकतेच प्रदान केले.

समुद्री चाच्यांनी अपहरण केल्याचा संशय असलेल्या इराणी मासेमारी जहाज ओमारीचा तपास करण्याचे काम या जहाजाला देण्यात आले होते. नौदल आरपीएने पाळत ठेवत दिलेल्या माहितीच्या आधारे, या जहाजाचा मार्ग रोखत रात्रभर माग ठेवला. 2 फेब्रुवारी 24 रोजी पहाटेच्या वेळी, जहाजाला संकेत दिले गेले आणि त्यानंतर प्रहार पथक धाडले गेले. जहाजाच्या आक्रमक पवित्र्याने चाच्यांना जहाजावरच्या सर्वाना आणि बोटीला सुरक्षितपणे सोडण्यास भाग पाडले. जहाजाच्या जलद आणि निर्णायक कृतींमुळे अपहृत मासेमारी जहाज आणि त्याच्या सदस्यांची सोमाली चाच्यांपासून सुटका झाली. जहाजाच्या अथक परिश्रमाने, चाचेगिरीविरोधी कारवाईसाठीच्या मोहिमेमुळे मोलाचे जीव वाचले आणि हिंद महासागर क्षेत्रातील खलाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढविण्याच्या भारतीय नौदलाच्या संकल्पाला अधिक बळकटी मिळाली.

नौदल प्रमुखांनी शारदाच्या चमूशी संवाद साधला आणि चाच्यांच्या हल्ल्याला तत्परतेने प्रत्युत्तर दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आपल्या भाषणादरम्यान आर हरी कुमार यांनी चालक दलाच्या व्यावसायिक दृष्टिकोनाची प्रशंसा केली ज्यामुळे भारतीय नौदलाला या प्रदेशातील पसंतीचे सुरक्षा भागीदार म्हणून मान्यता आणि प्रशंसा मिळाली.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content