Homeबॅक पेजआयएनएस शारदाला 'ऑन...

आयएनएस शारदाला ‘ऑन दी स्पॉट युनिट प्रशस्तिपत्र’!

सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ओलिस ठेवलेल्या इराणी मासेमारी जहाज ओमारीवरील सर्व 19 सदस्यांची (11 इराणी आणि 08 पाकिस्तानी) सुरक्षित सुटका करण्यात सहभागी असलेल्या आयएनएस शारदाला चाचेगिरीविरोधातल्या यशस्वी कारवाईबद्दल नौदलप्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी दक्षिणी नौदल कमांड, कोची येथील भेटीदरम्यान, ‘ऑन दी स्पॉट युनिट प्रशस्तिपत्र’ नुकतेच प्रदान केले.

समुद्री चाच्यांनी अपहरण केल्याचा संशय असलेल्या इराणी मासेमारी जहाज ओमारीचा तपास करण्याचे काम या जहाजाला देण्यात आले होते. नौदल आरपीएने पाळत ठेवत दिलेल्या माहितीच्या आधारे, या जहाजाचा मार्ग रोखत रात्रभर माग ठेवला. 2 फेब्रुवारी 24 रोजी पहाटेच्या वेळी, जहाजाला संकेत दिले गेले आणि त्यानंतर प्रहार पथक धाडले गेले. जहाजाच्या आक्रमक पवित्र्याने चाच्यांना जहाजावरच्या सर्वाना आणि बोटीला सुरक्षितपणे सोडण्यास भाग पाडले. जहाजाच्या जलद आणि निर्णायक कृतींमुळे अपहृत मासेमारी जहाज आणि त्याच्या सदस्यांची सोमाली चाच्यांपासून सुटका झाली. जहाजाच्या अथक परिश्रमाने, चाचेगिरीविरोधी कारवाईसाठीच्या मोहिमेमुळे मोलाचे जीव वाचले आणि हिंद महासागर क्षेत्रातील खलाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढविण्याच्या भारतीय नौदलाच्या संकल्पाला अधिक बळकटी मिळाली.

नौदल प्रमुखांनी शारदाच्या चमूशी संवाद साधला आणि चाच्यांच्या हल्ल्याला तत्परतेने प्रत्युत्तर दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आपल्या भाषणादरम्यान आर हरी कुमार यांनी चालक दलाच्या व्यावसायिक दृष्टिकोनाची प्रशंसा केली ज्यामुळे भारतीय नौदलाला या प्रदेशातील पसंतीचे सुरक्षा भागीदार म्हणून मान्यता आणि प्रशंसा मिळाली.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content