Homeटॉप स्टोरीआता सरकारी शाळांमधली...

आता सरकारी शाळांमधली मुले दिसणार एकाच गणवेशात!

राज्य सरकारी शाळांमधून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश, या योजनेची अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरवले असून यावर्षापासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या निर्णयापूर्वीच काही शाळांनी कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने तेथील विद्यार्थी आठवड्यातून तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात ‘एक रंग एक गणवेश’ धोरण यावर्षी राबवले जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत आहे. शाळा सुरू होण्यास अवघा एक महिना राहिला असताना शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत ‘एक रंग एक गणवेश’ धोरणाबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत ११ मे रोजी बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.

आता खासगी शाळांनीही विचार करावा लागेल. याबाबत शैक्षणिक संस्थांसोबत आपण बैठक घेणार आहोत. त्यांनाही आम्ही मोफत पुस्तक व गणवेश देऊ. एक गणवेश करण्यामागे शिस्त लागते. या एक गणवेशामागे कुठलाही आर्थिक हेतू नाही. यासाठी कंत्राट निघणार. कुणीही त्यात भाग घेऊ शकते. याबाबत कुठल्याही कंपनीशी संगनमत करण्यात आलेले नाही. मुलांना दर्जेदार कपडे मिळतील. बूट मिळतील. राज्यातील शासकीय शाळांकडे मुलाची ओढ वाढेल, असेही केसरकर म्हणाले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content