Homeएनसर्कलनितीन गडकरींनी इथेनॉलवर...

नितीन गडकरींनी इथेनॉलवर चालणारी जगातील पहिली कार केली लॉन्च!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे म्हणजेच इथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या कारचे नुकतेच उद्घाटन केले. हे वाहन टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने विकसित केले आहे.

या कार्यक्रमाला, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे, टोयोटा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझु योशीमुरा, किर्लोस्कर सिस्टिम्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली किर्लोस्कर, जपानच्या दूतावासातील राजदूत, सरकारी अधिकारी यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, इथेनॉल हे स्वदेशी, पर्यावरण-स्नेही आणि नवीकरणीय इंधन असून भारतात या इंधनाला मोठा वाव आहे. मोदी सरकारने इथेनॉलच्या वापरावर दिलेला भर उर्जेच्या संदर्भातील स्वयंपूर्णता मिळवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, उर्जादाते म्हणून त्यांच्यात स्थित्यंतर घडवून आणणे या उद्दिष्टांसह त्यांना अन्नदाता म्हणून मदत करणे आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकणे सुरु ठेवणे यांना अनुसरून आहे.

ते म्हणाले की ज्या दिवशी इथेनॉलची अर्थव्यवस्था 2 लाख कोटी रुपयांची होईल तेव्हा कृषी क्षेत्राच्या विकासाचा दर सध्याच्या 12% वरुन 20% पर्यंत पोहोचेल. जैवइंधनांच्या क्षेत्रातील अभिनव संशोधनांबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आसाममधील नुमलीगड येथे भारतीय तेल महामंडळाने उभारलेल्या तेल शुद्धीकरण केंद्राचा उल्लेख चर्चा केला. या केंद्रामध्ये जैवइथेनॉल निर्मितीसाठी बांबूचा वापर केला जातो.

आज उद्घाटन झालेले हे अभिनव पद्धतीचे वाहन इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे आणि त्याची निर्मिती करताना भारताच्या अधिक कठोर उत्सर्जनविषयक मानकांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे ते जागतिक पातळीवरील सर्वात पहिले बीएस 6 (पातळी 2) ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईप वाहन ठरले आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content