Homeचिट चॅटनितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या...

नितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या अंगणातच सेनेला दणका!

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी शिवसेनेला मातोश्रीच्या अंगणातच दणका दिला.

शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी काल असंख्य शिवसैनिकांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी आमदार नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या पक्षप्रवेशावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, पक्षाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर, मयूर बागेरीया उपस्थित होते.

शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांनी पतीच्या निधनानंतर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून पोटनिवडणूक लढविली व जिंकली होती. तेव्हा काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता. मात्र, नंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली. परिणामी तृप्ती सावंत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उभ्या ठाकल्या आणि तेथे शिवसेनेला आपली जागा गमवावी लागली. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी तेथून विजयी झाले.

आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात आमदार नितेश राणे यांनी तृप्ती सावंत यांनाच भाजपात आणले. सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी या पक्षप्रवेशाचा उल्लेख ‘बेगडी हिंदुत्वाकडून भगव्या हिंदुत्वाकडे!’, असा टोला शिवसेनेला लगावला.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content