Homeकल्चर +डॉ. उज्ज्वला चक्रदेव...

डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या ‘निळाई’चे प्रकाशन

भरारी प्रकाशन, मुंबई आयोजित प्रसिद्ध कवयित्री डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या ‘निळाई’ या नवीन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची आणि रसिक श्रोत्यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमीचे कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. नरेंद्र पाठक यांनी भूषवले.

यावेळी बोलताना त्यांनी डॉ. चक्रदेव यांच्या कवितांमधील भावविश्व आणि त्यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये उलगडून दाखवत संग्रहाचे कौतुक केले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील उपस्थित होत्या. साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. माधव राजवाडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
या प्रकाशन सोहळ्याचे नेटके नियोजन भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका लता गुठे यांनी केले. स्मिता आपटे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. रंजना वडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘होर्मूझ’च्या अमेरिकी नाकाबंदीला चीनचे थेट आव्हान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक कोंडी करण्याकरीता होर्मूझ सामुद्रधुनीभोवती नाकाबंदी सुरू केली असतानाच चीनने अमेरिकेच्या या कृतीला थेट आव्हान दिले आहे. अमेरिकेने आमच्या जहाजांना या नाकाबंदीत अडवू नये, असे म्हणत त्यांनी त्यांचे एक तेलवाहू होर्मूझ सामुद्रधुनीतून पाठवलेही....

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेची जोरदार तयारी

राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आदी मान्यवरांनी आज सकाळी शिवाजीपार्क येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी...

नितीश आज होणार पायऊतार, सम्राट चौधरी नवे मुख्यमंत्री?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आज दुपारी ४ वाजता पाटण्यात होणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील. याच बैठकीत बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल....
Skip to content