Homeकल्चर +'नारी तू नारायणी' हे...

‘नारी तू नारायणी’ हे केवळ घोषवाक्य नको!

आधुनिक शिक्षण महिलांना सबलता देणारे असून शिक्षणातून सक्षम महिला घडवायच्या असतील तर महिलांचे कर्तृत्त्व हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ‘नारी तू नारायणी’ हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्येक स्त्रीने आपल्या परीने सामाजिक, राष्ट्रीय समानता ठेवून कार्य केले पाहिजे, असे विचार एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केले.

विश्वभरारी फाऊंडेशन आयोजित भरारी प्रकाशनच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ येथे नुकताच आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना, या लता गुठे यांनी लिहिलेल्या आणि संचित संस्कृतीचे या लेखिका स्मिता भागवत लिखित पुस्तकांचे प्रकाशन झाले. गेल्या ७ वर्षांत प्रकाशित झालेले भरारी प्रकाशनचे हे ३००वे पुस्तक आहे. आमदार पराग अळवणी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, प्रकाशिका लता गुठे, माध्यम सल्लागार जयू भाटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देशभक्ती हा रोजच्या जगण्यातील विषय आहे. प्रत्येकाने समाजासाठी आणि देशासाठी जेवढे काही करता येईल, तेवढे चांगले काम करावे, असे विचार आमदार पराग अळवणी यांनी व्यक्त केले. लता गुठे यांच्या प्रकाशन क्षेत्रातील कार्याचे कौतुक करत यापुढील पुस्तक `क्रांतिकारकांच्या घरच्यांचे जीवन’ या विषयावर प्रकाशित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

`जगणं आमचं’ कार्यक्रमांतर्गत माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी विचारलेल्या मार्मिक प्रश्नांना वीरमाता अनुराधा गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेणुका बुवा आणि प्रकाशिका लता गुठे यांनी उत्तरे दिली. कॅ. विनायक गोरे यांच्या वीरमरणानंतर असंख्य विनायक तुझी वाट पहात आहेत, हे मुख्याध्यापकांचे वाक्य परिणाम करून गेले आणि क्षितिजामागून क्षितिजे उलगडत गेली. संकटात अदृश्य शक्ती साथ देते, असे विचार अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले. शारीरिक आणि मानसिक फिटनेस हा पोलिसांच्या जीवनात आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत रेणुका बुवा यांनी २६-११ हल्ल्यात केलेल्या कार्याला आणि आठवणींना उजाळा दिला. मीच माझी गुरु आणि मीच माझी शिष्य या भावनेतून काम करून प्रकाशन आणि साहित्यिक क्षेत्रात आलेले अनुभव लता गुठे यांनी कथन केले.

डॉ. संपदा पाटगावकर यांनी लता गुठे लिखित स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना, पुस्तकातील उताऱ्याचे प्रभावी वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले. सायली वेलणकर यांनी प्रारंभी गणेश आणि शारदा वंदना सादर केली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content