Homeकल्चर +'नारी तू नारायणी' हे...

‘नारी तू नारायणी’ हे केवळ घोषवाक्य नको!

आधुनिक शिक्षण महिलांना सबलता देणारे असून शिक्षणातून सक्षम महिला घडवायच्या असतील तर महिलांचे कर्तृत्त्व हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ‘नारी तू नारायणी’ हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्येक स्त्रीने आपल्या परीने सामाजिक, राष्ट्रीय समानता ठेवून कार्य केले पाहिजे, असे विचार एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केले.

विश्वभरारी फाऊंडेशन आयोजित भरारी प्रकाशनच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ येथे नुकताच आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना, या लता गुठे यांनी लिहिलेल्या आणि संचित संस्कृतीचे या लेखिका स्मिता भागवत लिखित पुस्तकांचे प्रकाशन झाले. गेल्या ७ वर्षांत प्रकाशित झालेले भरारी प्रकाशनचे हे ३००वे पुस्तक आहे. आमदार पराग अळवणी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, प्रकाशिका लता गुठे, माध्यम सल्लागार जयू भाटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देशभक्ती हा रोजच्या जगण्यातील विषय आहे. प्रत्येकाने समाजासाठी आणि देशासाठी जेवढे काही करता येईल, तेवढे चांगले काम करावे, असे विचार आमदार पराग अळवणी यांनी व्यक्त केले. लता गुठे यांच्या प्रकाशन क्षेत्रातील कार्याचे कौतुक करत यापुढील पुस्तक `क्रांतिकारकांच्या घरच्यांचे जीवन’ या विषयावर प्रकाशित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

`जगणं आमचं’ कार्यक्रमांतर्गत माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी विचारलेल्या मार्मिक प्रश्नांना वीरमाता अनुराधा गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेणुका बुवा आणि प्रकाशिका लता गुठे यांनी उत्तरे दिली. कॅ. विनायक गोरे यांच्या वीरमरणानंतर असंख्य विनायक तुझी वाट पहात आहेत, हे मुख्याध्यापकांचे वाक्य परिणाम करून गेले आणि क्षितिजामागून क्षितिजे उलगडत गेली. संकटात अदृश्य शक्ती साथ देते, असे विचार अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले. शारीरिक आणि मानसिक फिटनेस हा पोलिसांच्या जीवनात आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत रेणुका बुवा यांनी २६-११ हल्ल्यात केलेल्या कार्याला आणि आठवणींना उजाळा दिला. मीच माझी गुरु आणि मीच माझी शिष्य या भावनेतून काम करून प्रकाशन आणि साहित्यिक क्षेत्रात आलेले अनुभव लता गुठे यांनी कथन केले.

डॉ. संपदा पाटगावकर यांनी लता गुठे लिखित स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना, पुस्तकातील उताऱ्याचे प्रभावी वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले. सायली वेलणकर यांनी प्रारंभी गणेश आणि शारदा वंदना सादर केली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या राधिका जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर...

‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्रीरंग फडके यांनी लिहिलेल्या ‘रानसावल्या’, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर येथे होत आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक आयुक्त...

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....
Skip to content