Homeएनसर्कलऔद्योगिक - व्यापार...

औद्योगिक – व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद : उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती महामहीम जगदीशजी धनकड यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. महाराष्ट्राच्या औद्योगिक व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपदी जगदीश धनकड यांनी काढले. त्यासह महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय- नाशिकच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभासाठी त्यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले. यावेळी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र चेंबरचे युवा उद्योजक समितीचे चेअरमन संदीप भंडारी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती महामहीम जगदीश धनकड यांची चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खासदार धैर्यशील माने, संदीप भंडारी.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी महाराष्ट्र चेंबरतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांचे भारतीय उद्योग जगतातील अफाट योगदान आहे. देशाच्या जडणघडणीत उद्योजकांचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी आणि सरकारमधील महत्वाचा दुवा म्हणून महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या उद्योग, व्यापाराच्या जडणघडणीत चेंबरचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी यांचे हक्कांचे व्यासपीठ चेंबर असून त्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.

अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात उत्तर महाराष्ट्र शाखेच्या नवीन कार्यालयाची उभारणी केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र शाखा माइलस्टोन आहे. उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी उत्तर महाराष्ट्र शाखेने महत्त्वाचे कार्य केलेले असून व्यापार उद्योगाच्या विकासासाठी व्यापारी उद्योजकांच्या विविध संघटना स्थापन केल्या आहेत. दरम्यान अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले. त्यांनी महाराष्ट्र चेंबरचे आमंत्रण स्विकारुन उपस्थित राहण्याची ग्वाही अध्यक्ष गांधी यांना दिली.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content