Homeबॅक पेजएलआयसी-आयडियल चषक बुद्धिबळ...

एलआयसी-आयडियल चषक बुद्धिबळ स्पर्धा उद्यापासून

बालदिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक १४ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा उद्या, १५ नोव्हेंबरला आणि सर्वांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या परळ येथील आरएमएमएस वातानुकूलीत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी एकूण १२० पुरस्कार असून खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी एकूण २५ रोख पुरस्कारांसह प्रथम पुरस्कार रोख रुपये पाच हजारसह आकर्षक एलआयसी-आयडियल चषक आहे. खुल्या स्पर्धेतसुद्धा १३ वर्षांखालील विविध वयोगटासाठी विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना व राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने ही स्पर्धा येत्या शनिवारी ७/८/१०/११/१३/१४ वर्षांखालील मुला-मुलींच्या ६ वयोगटात स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ साखळी फेऱ्यांमध्ये तर खुल्या गटाची बुद्धिबळ स्पर्धा येत्या रविवारी स्विस लीग पद्धतीच्या किमान ७ साखळी फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुद्धिबळ पट व घड्याळ दिले जाणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी शिवछत्रपती पुरस्कारविजेते संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉट्सअॅपवर १२ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा.   

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content