Homeडेली पल्सदिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा रेल्वे...

दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा रेल्वे ट्रॅक सुरक्षित करणार ‘कवच’!

रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टळण्यासाठी उपयोगी ठरणारी कवच प्रणाली आता दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा  रेल्वेमार्गाच्या अंदाजे 3000 किमी मार्गावर बसविण्यात येणार आहे. याकरीता नुकत्याच निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत आणि या मार्गांवर काम सुरू झाले आहे.

कवच ही स्वदेशी विकसित केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. कवच ही एक उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशी एक प्रणाली आहे, ज्याला सर्वोच्च पातळीचे सुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे. कवच विशिष्ट वेग मर्यादेत रेल्वे चालवण्यासाठी लोको पायलटला मदत करते आणि खराब हवामानात रेल्वेला सुरक्षितपणे धावण्यास मदत करते.

कवच आतापर्यंत 1465 किमी मार्गावर आणि 121 लोकोमोटिव्ह दक्षिण मध्य रेल्वेवर (इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट रेकसह) तैनात केले गेले आहे. भारतीय रेल्वे यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) आणि आणखी 6000 किलोमीटर मार्गासाठी साठी तपशीलवार अंदाज तयार करत आहे.

कवचच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत 351.91 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कवचच्या स्टेशन उपकरणासह रेल्वे रूळसाठीच्या तरतुदीची किंमत अंदाजे 50 लाख रुपये प्रति किलोमीटर आहे. गाडीवर कवच उपकरण बसवण्यासाठी अंदाजे 70 लाख रुपये प्रति लोको खर्च आहे.

सध्या तीन भारतीय ओईएम कंपन्या कवचसाठी मंजूर केल्या आहेत. कवचची क्षमता आणि त्याची अंमलबजावणी वाढविण्यासाठी आणखी वेंडर्सचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Ashwini Vaishnaw, India’s minister of railways, at the Viva Technology Conference in Paris, France, on Wednesday, June 15, 2022. The conference, also known as VivaTech, runs though to June 18. Photographer: Nathan Laine/Bloomberg via Getty Images

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content