Homeडेली पल्सदिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा रेल्वे...

दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा रेल्वे ट्रॅक सुरक्षित करणार ‘कवच’!

रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टळण्यासाठी उपयोगी ठरणारी कवच प्रणाली आता दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा  रेल्वेमार्गाच्या अंदाजे 3000 किमी मार्गावर बसविण्यात येणार आहे. याकरीता नुकत्याच निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत आणि या मार्गांवर काम सुरू झाले आहे.

कवच ही स्वदेशी विकसित केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. कवच ही एक उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशी एक प्रणाली आहे, ज्याला सर्वोच्च पातळीचे सुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे. कवच विशिष्ट वेग मर्यादेत रेल्वे चालवण्यासाठी लोको पायलटला मदत करते आणि खराब हवामानात रेल्वेला सुरक्षितपणे धावण्यास मदत करते.

कवच आतापर्यंत 1465 किमी मार्गावर आणि 121 लोकोमोटिव्ह दक्षिण मध्य रेल्वेवर (इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट रेकसह) तैनात केले गेले आहे. भारतीय रेल्वे यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) आणि आणखी 6000 किलोमीटर मार्गासाठी साठी तपशीलवार अंदाज तयार करत आहे.

कवचच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत 351.91 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कवचच्या स्टेशन उपकरणासह रेल्वे रूळसाठीच्या तरतुदीची किंमत अंदाजे 50 लाख रुपये प्रति किलोमीटर आहे. गाडीवर कवच उपकरण बसवण्यासाठी अंदाजे 70 लाख रुपये प्रति लोको खर्च आहे.

सध्या तीन भारतीय ओईएम कंपन्या कवचसाठी मंजूर केल्या आहेत. कवचची क्षमता आणि त्याची अंमलबजावणी वाढविण्यासाठी आणखी वेंडर्सचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Ashwini Vaishnaw, India’s minister of railways, at the Viva Technology Conference in Paris, France, on Wednesday, June 15, 2022. The conference, also known as VivaTech, runs though to June 18. Photographer: Nathan Laine/Bloomberg via Getty Images

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content