Homeपब्लिक फिगरते जिंकले वा...

ते जिंकले वा हरले तरी काही फरक पडत नाही!

ते जिंकले किंवा हरले तरी काही फरक पडत नाही, पण खेळामध्ये निरोगी स्पर्धा असली पाहिजे आणि खेळाडूंनी इतर संघांचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात ड्युरंड चषक स्पर्धेच्या 2024च्या चषकांचे अनावरण केले. अनावरण केलेल्या करंडकांमध्ये ड्युरंड चषक, राष्ट्रपती चषक आणि शिमला चषक यांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रपतींनी ड्युरंड चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

काहीवेळा खेळामध्ये भावनांचा आवेग असतो. परंतु खेळाडूंनी त्यांच्या भावनांना योग्यरित्या समायोजित करण्यासाठी आणि खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सर्व खेळाडू जिद्दीने आणि खिलाडू वृत्तीने खेळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. व्यावसायिक फुटबॉलपटू जेव्हा हजारो चाहत्यांसमोर खेळतात तेव्हा खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह कैक पटींनी वाढतो, असेही त्या म्हणाल्या. भारतातील फुटबॉलचा स्तर उंचावण्यासाठी सर्व फुटबॉलप्रेमींनी प्रयत्न करावे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.

भारतातली राष्ट्रीय स्तरावरील एक प्रसिद्ध आणि नामांकित फुटबॉल स्पर्धा म्हणून ड्युरंड चषक स्पर्धेला ओळखले जाते. १८८८ सालापासून ही स्पर्धा सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे पहिली ड्युरंड चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Continue reading

खेडच्या सणघरमध्ये माजी सैनिकाचा संशयस्पद मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात...

केरळवासियांना काल नव्याने मिळाली ‘मोदींची गॅरंटी’!

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा 'मुंडू' (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी...

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...
Skip to content