Homeटॉप स्टोरीबारसू रिफायनरीवरून उद्धव...

बारसू रिफायनरीवरून उद्धव ठाकरेंची कोंडी?

रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

कालपासून बारसू येथे राज्य सरकारकडून माती परिक्षणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी तेथील ग्रामस्थांकडून सरकारला तीव्र विरोध करण्यात आला. उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांकडून त्यांना पाठिंबा दिला जात आहे. ही बाब समोर येताच उद्याग मंत्री उदय सामंत यांनी बारसू येथील जागेवर रिफायनरी करावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत केंद्राकडे पाठवल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरीच्या विरोधामागचे सुपारीबाज कोण, असा जाहीर सवाल करत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

आज सकाळी उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि बारसू रिफायनरीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना सामंत यांनी बारसू रिफायनरीसाठी जागा ताब्यात घेण्याचा विषय सध्या नसल्याचे स्पष्ट केले. सध्या फक्त जमिनीचे परिक्षण केले जात आहे. ही जमीन रिफायनरीसाठी योग्य असल्यास नंतर त्याबाबत विचार होईल. या रिफायनरीच्या प्रकल्पाबाबत सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जाईल. जाईल. काल नाना पटोले यांनीही आपला प्रकल्पाला विरोध नसल्याचे सांगितले आहे. आज पवारांशी चर्चा झाली. उद्या काँग्रेसच्या नेत्यांशी, राज ठाकरेंशी, सर्वांशी चर्चा करू. जे समजूतदार नेते आहेत ते चर्चा करतील, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

सत्ताधाऱ्यांची नेमकी हीच भूमिका उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत वेगळे पाडण्यासाठी घेतली जात आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content