Homeटॉप स्टोरीबारसू रिफायनरीवरून उद्धव...

बारसू रिफायनरीवरून उद्धव ठाकरेंची कोंडी?

रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

कालपासून बारसू येथे राज्य सरकारकडून माती परिक्षणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी तेथील ग्रामस्थांकडून सरकारला तीव्र विरोध करण्यात आला. उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांकडून त्यांना पाठिंबा दिला जात आहे. ही बाब समोर येताच उद्याग मंत्री उदय सामंत यांनी बारसू येथील जागेवर रिफायनरी करावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत केंद्राकडे पाठवल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरीच्या विरोधामागचे सुपारीबाज कोण, असा जाहीर सवाल करत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

आज सकाळी उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि बारसू रिफायनरीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना सामंत यांनी बारसू रिफायनरीसाठी जागा ताब्यात घेण्याचा विषय सध्या नसल्याचे स्पष्ट केले. सध्या फक्त जमिनीचे परिक्षण केले जात आहे. ही जमीन रिफायनरीसाठी योग्य असल्यास नंतर त्याबाबत विचार होईल. या रिफायनरीच्या प्रकल्पाबाबत सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जाईल. जाईल. काल नाना पटोले यांनीही आपला प्रकल्पाला विरोध नसल्याचे सांगितले आहे. आज पवारांशी चर्चा झाली. उद्या काँग्रेसच्या नेत्यांशी, राज ठाकरेंशी, सर्वांशी चर्चा करू. जे समजूतदार नेते आहेत ते चर्चा करतील, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

सत्ताधाऱ्यांची नेमकी हीच भूमिका उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत वेगळे पाडण्यासाठी घेतली जात आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Continue reading

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...
Skip to content