Homeटॉप स्टोरीसुभाष देसाईंचे ‘उद्योग’......

सुभाष देसाईंचे ‘उद्योग’… 3 हजार कोटींचा घोटाळा?

राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि त्यांचे पुत्र भूषण सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेल्या जागा रहिवासी जागांमध्ये परावर्तित करून 3000 कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केला. या दोघांचीही एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे जाहीर केले.

माहितीच्या मुद्द्याच्या आधारे भातखळकर यांनी हा विषय उपस्थित केला. कोरोनाचा कहर सुरू असताना, लोक त्राही त्राही होत असताना, रेमडिसिविर मिळत नसताना, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसताना या दोघांनी सरकारी पैशाची लूट केली. एकेका दिवशी सहा-सहा आदेश काढून औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेले भूखंड रहिवासी वापरासाठी मोकळे केले, असे ते म्हणाले.

देसाई

या भूखंडांचा एकूण परिसर चार लाख 14 हजार चौरस मीटर इतका आहे. त्यांची बाजारातली किंमत 3109 कोटी आहे आणि हे भूखंड परावर्तित केल्यामुळे सरकारच्या तिजोरीत फक्त 168 कोटी रुपये आले. मग हे 3000 कोटी कोणाच्या घशात गेले? मातोश्रीला तर गेले नाहीत ना? हे भूषण सुभाष देसाई सोफीटेल हॉटेलमध्ये बसून काय करत होते? तेव्हाच्या या उद्योग मंत्र्यांनी 20/05/2019, 24/09/2019 आणि 13/10/2019 या तीन दिवशी, दिवसाला सहा-सहा आदेश काढून हे भूखंड निवासी वापरासाठी परावर्तित केले. औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवण्यात आलेले भूखंड थेट रहिवासी वापरासाठी परावर्तित करता येत नाहीत. ते आधी व्यापारी कारणासाठी परावर्तित करावे लागतात आणि नंतर जर गरज भासली तरच ते निवासी वापरासाठी परावर्तित करता येऊ शकतात, ही कायदेशीर तरतूद असताना अत्यंत बेकायदेशीरपणे काम करत देसाई यांनी हा घोटाळा केला असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.

हे भूषण देसाई तर कोकणचे कसाई, असे म्हणणारे आज त्यांची बाजू घेत आहेत, असा टोलाही त्यांनी भास्कर जाधव यांनी हरकत घेताच लगावला.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content