Homeटॉप स्टोरीसुभाष देसाईंचे ‘उद्योग’......

सुभाष देसाईंचे ‘उद्योग’… 3 हजार कोटींचा घोटाळा?

राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि त्यांचे पुत्र भूषण सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेल्या जागा रहिवासी जागांमध्ये परावर्तित करून 3000 कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केला. या दोघांचीही एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे जाहीर केले.

माहितीच्या मुद्द्याच्या आधारे भातखळकर यांनी हा विषय उपस्थित केला. कोरोनाचा कहर सुरू असताना, लोक त्राही त्राही होत असताना, रेमडिसिविर मिळत नसताना, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसताना या दोघांनी सरकारी पैशाची लूट केली. एकेका दिवशी सहा-सहा आदेश काढून औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेले भूखंड रहिवासी वापरासाठी मोकळे केले, असे ते म्हणाले.

देसाई

या भूखंडांचा एकूण परिसर चार लाख 14 हजार चौरस मीटर इतका आहे. त्यांची बाजारातली किंमत 3109 कोटी आहे आणि हे भूखंड परावर्तित केल्यामुळे सरकारच्या तिजोरीत फक्त 168 कोटी रुपये आले. मग हे 3000 कोटी कोणाच्या घशात गेले? मातोश्रीला तर गेले नाहीत ना? हे भूषण सुभाष देसाई सोफीटेल हॉटेलमध्ये बसून काय करत होते? तेव्हाच्या या उद्योग मंत्र्यांनी 20/05/2019, 24/09/2019 आणि 13/10/2019 या तीन दिवशी, दिवसाला सहा-सहा आदेश काढून हे भूखंड निवासी वापरासाठी परावर्तित केले. औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवण्यात आलेले भूखंड थेट रहिवासी वापरासाठी परावर्तित करता येत नाहीत. ते आधी व्यापारी कारणासाठी परावर्तित करावे लागतात आणि नंतर जर गरज भासली तरच ते निवासी वापरासाठी परावर्तित करता येऊ शकतात, ही कायदेशीर तरतूद असताना अत्यंत बेकायदेशीरपणे काम करत देसाई यांनी हा घोटाळा केला असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.

हे भूषण देसाई तर कोकणचे कसाई, असे म्हणणारे आज त्यांची बाजू घेत आहेत, असा टोलाही त्यांनी भास्कर जाधव यांनी हरकत घेताच लगावला.

Continue reading

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...
Skip to content