Homeटॉप स्टोरीसुभाष देसाईंचे ‘उद्योग’......

सुभाष देसाईंचे ‘उद्योग’… 3 हजार कोटींचा घोटाळा?

राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि त्यांचे पुत्र भूषण सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेल्या जागा रहिवासी जागांमध्ये परावर्तित करून 3000 कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केला. या दोघांचीही एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे जाहीर केले.

माहितीच्या मुद्द्याच्या आधारे भातखळकर यांनी हा विषय उपस्थित केला. कोरोनाचा कहर सुरू असताना, लोक त्राही त्राही होत असताना, रेमडिसिविर मिळत नसताना, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसताना या दोघांनी सरकारी पैशाची लूट केली. एकेका दिवशी सहा-सहा आदेश काढून औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेले भूखंड रहिवासी वापरासाठी मोकळे केले, असे ते म्हणाले.

देसाई

या भूखंडांचा एकूण परिसर चार लाख 14 हजार चौरस मीटर इतका आहे. त्यांची बाजारातली किंमत 3109 कोटी आहे आणि हे भूखंड परावर्तित केल्यामुळे सरकारच्या तिजोरीत फक्त 168 कोटी रुपये आले. मग हे 3000 कोटी कोणाच्या घशात गेले? मातोश्रीला तर गेले नाहीत ना? हे भूषण सुभाष देसाई सोफीटेल हॉटेलमध्ये बसून काय करत होते? तेव्हाच्या या उद्योग मंत्र्यांनी 20/05/2019, 24/09/2019 आणि 13/10/2019 या तीन दिवशी, दिवसाला सहा-सहा आदेश काढून हे भूखंड निवासी वापरासाठी परावर्तित केले. औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवण्यात आलेले भूखंड थेट रहिवासी वापरासाठी परावर्तित करता येत नाहीत. ते आधी व्यापारी कारणासाठी परावर्तित करावे लागतात आणि नंतर जर गरज भासली तरच ते निवासी वापरासाठी परावर्तित करता येऊ शकतात, ही कायदेशीर तरतूद असताना अत्यंत बेकायदेशीरपणे काम करत देसाई यांनी हा घोटाळा केला असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.

हे भूषण देसाई तर कोकणचे कसाई, असे म्हणणारे आज त्यांची बाजू घेत आहेत, असा टोलाही त्यांनी भास्कर जाधव यांनी हरकत घेताच लगावला.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content