Homeटॉप स्टोरीसुभाष देसाईंचे ‘उद्योग’......

सुभाष देसाईंचे ‘उद्योग’… 3 हजार कोटींचा घोटाळा?

राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि त्यांचे पुत्र भूषण सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेल्या जागा रहिवासी जागांमध्ये परावर्तित करून 3000 कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केला. या दोघांचीही एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे जाहीर केले.

माहितीच्या मुद्द्याच्या आधारे भातखळकर यांनी हा विषय उपस्थित केला. कोरोनाचा कहर सुरू असताना, लोक त्राही त्राही होत असताना, रेमडिसिविर मिळत नसताना, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसताना या दोघांनी सरकारी पैशाची लूट केली. एकेका दिवशी सहा-सहा आदेश काढून औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेले भूखंड रहिवासी वापरासाठी मोकळे केले, असे ते म्हणाले.

देसाई

या भूखंडांचा एकूण परिसर चार लाख 14 हजार चौरस मीटर इतका आहे. त्यांची बाजारातली किंमत 3109 कोटी आहे आणि हे भूखंड परावर्तित केल्यामुळे सरकारच्या तिजोरीत फक्त 168 कोटी रुपये आले. मग हे 3000 कोटी कोणाच्या घशात गेले? मातोश्रीला तर गेले नाहीत ना? हे भूषण सुभाष देसाई सोफीटेल हॉटेलमध्ये बसून काय करत होते? तेव्हाच्या या उद्योग मंत्र्यांनी 20/05/2019, 24/09/2019 आणि 13/10/2019 या तीन दिवशी, दिवसाला सहा-सहा आदेश काढून हे भूखंड निवासी वापरासाठी परावर्तित केले. औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवण्यात आलेले भूखंड थेट रहिवासी वापरासाठी परावर्तित करता येत नाहीत. ते आधी व्यापारी कारणासाठी परावर्तित करावे लागतात आणि नंतर जर गरज भासली तरच ते निवासी वापरासाठी परावर्तित करता येऊ शकतात, ही कायदेशीर तरतूद असताना अत्यंत बेकायदेशीरपणे काम करत देसाई यांनी हा घोटाळा केला असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.

हे भूषण देसाई तर कोकणचे कसाई, असे म्हणणारे आज त्यांची बाजू घेत आहेत, असा टोलाही त्यांनी भास्कर जाधव यांनी हरकत घेताच लगावला.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content