Homeटॉप स्टोरीसर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या...

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजू लंगडी?

आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. साऱ्या जगाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. यावर केवळ शिवसेनेचे भवितव्यच अवलंबून नाही तर देशात लोकशाहीचे भविष्य किती काळ राहील, हे स्पष्ट होईल, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू लंगडी असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

११ जुलैला होणारी सुनावणी ही देशात लोकशाहीचे अस्तित्त्व किती काळ टिकणार आहे…. राज्यघटनेनुसार कारभार होणार आहे की नाही असा दिशा देणारा निकाल असेल…. असे ते म्हणाले.

आज एका पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी शिवसेना तसेच शिवसेनेचा धुष्यबाण, हे चिन्ह कोणीही नेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष वेगळा आणि रस्त्यावरचा पक्ष वेगळा आहे. जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारी शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे. काही आमदार एकाकडे गेले म्हणजे पक्ष तिकडे गेला असे नाही. काही नगरसेवक तिकडे गेल्याचे सांगितले जाते. परंतु महापालिकाच आता अस्तित्त्वात नाहीत. ते शिवसैनिक नाहीत तर ज्यांना त्यांच्या सांगण्यानुसार तिकिटे दिली ते कार्यकर्ते गेले, असे ते म्हणाले.

पैशाचे आमीष, धमक्यांना न जुमानता जे १५-१६ आमदार आमच्याबरोबर राहिले आहेत, त्यांचा सत्कार करायला हवा. आज अनेकजण म्हणतात की, आजही बोलावले तर यायला तयार आहोत. हे मी आधीच बोललो होतो. सूरतला जाऊन बोलायची गरज नव्हती. गेली अडीच वर्षे हेच लोक माझ्या कुटुंबियांविषयी विकृत भाषा वापरत होते. त्यांना विरोध करणारे भाष्य कुणी केले नाही. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसत आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

राष्ट्रपती निवडणुकीत कोणती भूमिका घ्याची याबाबत खासदारांशी, माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेईन, असे ते म्हणाले. राज्यात हिम्मत असेल तर विधानसभेच्या निवडणुका घ्या, असे आव्हानही त्यांनी पक्षातल्या शिंदे गटाला दिले.

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content