Homeटॉप स्टोरीभाजपाकडून पुन्हा ‘महायुती’चा...

भाजपाकडून पुन्हा ‘महायुती’चा प्रयत्न?

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सामोरे जाताना भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा ‘महायुती’चा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. सध्या रिपब्लिकन पक्ष (आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष असे लहानलहान पक्ष भाजपाबरोबर आहे. शिवसेना भाजपापासून दुरावली होती. मात्र, त्यातला एकनाथ शिंदे गट पुन्हा भाजपाबरोबर आला आहे. आता या महायुतीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहभागी व्हावे, असा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचे बोलले जाते.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांनी काल राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यापाठोपाठ आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शीवतीर्थ, या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी ही सदिच्छा भेट होती, असे सांगितले. गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण गेलो होतो. महाराष्ट्रात भाजपा वाढवणे हे आपले काम आहे. युती करायची की नाही, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेही घेणार दसरा मेळावा?

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आतापासूनच दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरू करण्यात आली असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटानेही दसऱ्याला मेळावा घेण्याची तयारी चालवली जात असल्याचे बोलले जाते. त्यातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दसऱ्याला मेळावा घ्यावा, असा आग्रह मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे यांच्याकडे धरण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना ही माहिती दिली. हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या दिवशी कार्यकर्त्यांना संबोधित करावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content