Homeएनसर्कलखाद्यतेलातील आत्मनिर्भरतेसाठी भारताची...

खाद्यतेलातील आत्मनिर्भरतेसाठी भारताची पाम मेगा लागवड मोहीम!

वर्ष 2025-26 पर्यंत पामच्या लागवडीखालील क्षेत्र 10 लाख हेक्टर पर्यंत वाढवण्याच्या आणि कच्च्या पाम तेलाचे उत्पादन 11.20 लाख  टनांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – पामतेल सुरु केले. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी 25 जुलै 2023 पासून पामतेल उत्पादकांसोबत पामच्या मेगा लागवड योजनेला आरंभ केला आहे. पतंजली फूड प्रा. लि, गोदरेज एग्रोवेट आणि 3F या तीन प्रमुख पामतेल प्रक्रिया कंपन्या लागवडीच्या विक्रमी क्षेत्र विस्तारासाठी आपापल्या राज्यातील शेतकऱ्यांसोबत यात सहभागी होत आहेत आणि प्रोत्साहन देत आहेत.

खाद्यतेलाच्या उत्पादनातील वाढीसोबतच या योजनेने खाद्यतेलाची आयात कमी करुन एकप्रकारे भारताचा आत्मनिर्भर भारताकडे होणारा प्रवास सुकर केला.

मेगा लागवड मोहीम 25 जुलै 2023 रोजी सुरू झाली आणि 12 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, गोवा, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल ही प्रमुख पाम तेल उत्पादक राज्ये या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content