Friday, October 18, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजभारतीय हवाई दलातल्या...

भारतीय हवाई दलातल्या मिग-21ची निवृत्तीकडे वाटचाल सुरू!

उत्तरलाई येथील हवाई तळावर 30 ऑक्टोबर 23 रोजी आयोजित एका समारंभाद्वारे भारतीय हवाई दलात नवीन विमानांचा औपचारिक समावेश करण्यात आला. या समारंभात मिग-21 आणि सुखोई-30 एमकेआय या विमानांनी एकत्रित हवाई कसरती केल्या. या माध्यमातून मिग-21 विमानांच्या स्क्वाड्रनने शेवटचे उड्डाण केले. या समारंभाला विविध लष्करी आणि नागरी मान्यवरांची उपस्थिती होती. भारतीय हवाई दल आता मिग-21 विमानांच्या केवळ दोन स्क्वाड्रनचे परिचालन करेल, हे या स्क्वाड्रनचे सुखोई-30 एमकेआय मध्ये रूपांतर सूचित करते. भारतीय हवाई दल 2025 पर्यंत मिग-21 विमानांचा वापर टप्प्याटप्प्याने थांबवण्यासाठी वचनबद्ध आहे.

भारतीय हवाई दलाची उत्तरलाई (बाडमेर) हवाई तळावर स्थित क्रमांक 4 ची स्क्वाड्रन (ऊरिअल्स) मिग-21 मधून सुखोई-30 एमकेआयमध्ये रूपांतरित करण्यात आली असून 1966 पासून मिग-21 चे परिचालन करणाऱ्या स्क्वाड्रनचा इतिहासातील निर्णायक क्षण आहे. मिग-21 हे भारतीय हवाई दलाच्या सेवेतील पहिले स्वनातीत (सुपरसॉनिक) लढाऊ विमान आहे आणि 1963 मध्ये हवाई दलात या विमानाचा समावेश झाला होता, तेव्हापासून सर्व मोठ्या युद्धांमध्ये या विमानाचा सहभाग होता. हा बदल भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि त्याचवेळी देशाच्या अवकाशाचे रक्षण करण्यासाठी अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content