Homeन्यूज अँड व्ह्यूजभारतीय हवाई दलातल्या...

भारतीय हवाई दलातल्या मिग-21ची निवृत्तीकडे वाटचाल सुरू!

उत्तरलाई येथील हवाई तळावर 30 ऑक्टोबर 23 रोजी आयोजित एका समारंभाद्वारे भारतीय हवाई दलात नवीन विमानांचा औपचारिक समावेश करण्यात आला. या समारंभात मिग-21 आणि सुखोई-30 एमकेआय या विमानांनी एकत्रित हवाई कसरती केल्या. या माध्यमातून मिग-21 विमानांच्या स्क्वाड्रनने शेवटचे उड्डाण केले. या समारंभाला विविध लष्करी आणि नागरी मान्यवरांची उपस्थिती होती. भारतीय हवाई दल आता मिग-21 विमानांच्या केवळ दोन स्क्वाड्रनचे परिचालन करेल, हे या स्क्वाड्रनचे सुखोई-30 एमकेआय मध्ये रूपांतर सूचित करते. भारतीय हवाई दल 2025 पर्यंत मिग-21 विमानांचा वापर टप्प्याटप्प्याने थांबवण्यासाठी वचनबद्ध आहे.

भारतीय हवाई दलाची उत्तरलाई (बाडमेर) हवाई तळावर स्थित क्रमांक 4 ची स्क्वाड्रन (ऊरिअल्स) मिग-21 मधून सुखोई-30 एमकेआयमध्ये रूपांतरित करण्यात आली असून 1966 पासून मिग-21 चे परिचालन करणाऱ्या स्क्वाड्रनचा इतिहासातील निर्णायक क्षण आहे. मिग-21 हे भारतीय हवाई दलाच्या सेवेतील पहिले स्वनातीत (सुपरसॉनिक) लढाऊ विमान आहे आणि 1963 मध्ये हवाई दलात या विमानाचा समावेश झाला होता, तेव्हापासून सर्व मोठ्या युद्धांमध्ये या विमानाचा सहभाग होता. हा बदल भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि त्याचवेळी देशाच्या अवकाशाचे रक्षण करण्यासाठी अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content