Homeन्यूज अँड व्ह्यूजभारत आणि सौदी...

भारत आणि सौदी अरेबिया करणार ऊर्जा क्षेत्रात सहकार्य! 

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्याबद्दल सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यानच्या या करारावर नवी दिल्लीत 10 सप्टेंबर 2023 रोजी नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर के सिंह आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुल्ला अझिज बिन सलमान बिन अब्दुल्ला अझिज अल सौद यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य करारानुसार, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात खालील बाबींवर सहकार्य होणार आहे:

  1. अक्षय ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, हायड्रोजन, वीज आणि दोन देशांमधील ग्रीड जोडणी, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, धोरणात्मक पेट्रोलियम साठे आणि ऊर्जा सुरक्षा.
  2. अक्षय ऊर्जा, वीज, हायड्रोजन आणि आणि तेल आणि वायू साठवण क्षेत्रात द्विपक्षीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.
  3. चक्राकार अर्थव्यवस्था आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी त्याचे तंत्रज्ञान, जसे की: कार्बन कॅप्चर, वापर आणि साठवण.
  4. ऊर्जा क्षेत्रात डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि सायबर-सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणे.
  5. उर्जेशी संबंधित सर्व क्षेत्रे, पुरवठा साखळ्या आणि त्यांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित साहित्य, उत्पादने आणि सेवांना स्थानिक वापर करण्यासाठी दोन्ही देशांमधील गुणात्मक भागीदारी विकसित करण्यावर काम करणे.
  6. ऊर्जा क्षेत्रात  प्राविण्य असलेल्या कंपन्यांशी सहकार्य अधिक दृढ करणे.
  7. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित इतर कुठल्याही क्षेत्रांबद्दल सहकार्य करण्यास दोन्ही देशांची सहमति असल्यास.

या सामंजस्य करारामुळे, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात एक मजबूत भागीदारी विकसित होईल. हा सामंजस्य करार भारताच्या ऊर्जा संक्रमणाला  तसेच हवामान बदलाच्या दृष्टीने जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील परिवर्तनाला पाठबळ मिळू शकेल.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content