Homeन्यूज अँड व्ह्यूजभारत आणि सौदी...

भारत आणि सौदी अरेबिया करणार ऊर्जा क्षेत्रात सहकार्य! 

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्याबद्दल सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यानच्या या करारावर नवी दिल्लीत 10 सप्टेंबर 2023 रोजी नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर के सिंह आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुल्ला अझिज बिन सलमान बिन अब्दुल्ला अझिज अल सौद यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य करारानुसार, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात खालील बाबींवर सहकार्य होणार आहे:

  1. अक्षय ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, हायड्रोजन, वीज आणि दोन देशांमधील ग्रीड जोडणी, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, धोरणात्मक पेट्रोलियम साठे आणि ऊर्जा सुरक्षा.
  2. अक्षय ऊर्जा, वीज, हायड्रोजन आणि आणि तेल आणि वायू साठवण क्षेत्रात द्विपक्षीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.
  3. चक्राकार अर्थव्यवस्था आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी त्याचे तंत्रज्ञान, जसे की: कार्बन कॅप्चर, वापर आणि साठवण.
  4. ऊर्जा क्षेत्रात डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि सायबर-सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणे.
  5. उर्जेशी संबंधित सर्व क्षेत्रे, पुरवठा साखळ्या आणि त्यांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित साहित्य, उत्पादने आणि सेवांना स्थानिक वापर करण्यासाठी दोन्ही देशांमधील गुणात्मक भागीदारी विकसित करण्यावर काम करणे.
  6. ऊर्जा क्षेत्रात  प्राविण्य असलेल्या कंपन्यांशी सहकार्य अधिक दृढ करणे.
  7. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित इतर कुठल्याही क्षेत्रांबद्दल सहकार्य करण्यास दोन्ही देशांची सहमति असल्यास.

या सामंजस्य करारामुळे, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात एक मजबूत भागीदारी विकसित होईल. हा सामंजस्य करार भारताच्या ऊर्जा संक्रमणाला  तसेच हवामान बदलाच्या दृष्टीने जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील परिवर्तनाला पाठबळ मिळू शकेल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content